साधना साप्ताहिकाच्या १ मे १९९४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ना. ग. गोरे प्रथम स्मृतिदिन विशेषांकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या लेखात एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात की ‘आगरकरांचा अपवाद सोडला तर सर्व समाजसुधारकांनी धर्मसुधारणेची चळवळ चालविली ही त्यांची वैचारिक मर्यादा होती की प्रगल्भता? डॉ.आंबेडकर, गाडगेमहाराज यांच्यानंतरच्या जवळपासच्या गेल्या अर्धशतकात महाराष्ट्रात धर्मभावनेविषयी जनसामान्यांच्या मनाशी होणारा संवाद थांबला, कृतिकार्यक्रम तर दूरचराहिला, हे परिवर्तनवादी शक्तींच्या दृष्टीने इष्ट की अनिष्ट?… नानासाहेब व त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्या, ज्या सर्वांच्यापासून आम्ही वैचारिक मार्गदर्शन घेतले, ते सर्वजण याबाबत निःसंदेह होते.
विषय «इतर»
अमेरिकन शिक्षण : दशा आणि दिशा
सार्वजनिक शाळांचा जनक म्हणून गणला जाणारा होरेस मॅन हा १८३० च्या एका भाषणात म्हणाला होता, ‘शिक्षण हाच सामाजिक समतेचा पाया आहे. १६३५ ते १८०० पर्यंत येथील बहुसंख्य विश्वविद्यालये व प्राथमिक माध्यमिक शाळा खाजगी मालकीच्याहोत्या. शिक्षण हे पैसेवाल्यांच्या हातातील खेळणे होऊन बसले होते. मध्यमवर्ग व तळागाळाची जनता ही शिक्षणापासून जवळजवळ वंचित झाली होती. पण अशी ‘स्फोटक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती ही उगवत्या लोकशाहीला मारक ठरेल हे लक्षात घेऊन होरेस मॅन, हेन्री बर्नार्ड व चार्ल्स वाइलीसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या जिवाचे रान करून धर्म-जात ह्यांच्या मर्यादा उल्लंघून सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रचंड मोहीम अंगीकारली व १८५० च्या सुमारास ‘सार्वजनिक (पब्लिक) शाळांचा पाया घालून अमेरिकन लोकशाहीचा पाया मजबूत केला.
दंगली का होतात आणि कशा त्या थांबतील?
‘दंगल’ हा शब्द वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मी प्रथम ऐकला तो सोलापुरात. मुसलमान समाजाची वस्ती तेथे बर्या च प्रमाणात आहे. १९३० सालाच्या आगेमागे तेथे हिंदू-मुसलमानांचे दंगे वरचेवर होत असत.
‘फोडा आणि निर्वेध राज्य करा हे परकीय ब्रिटिश सत्तेचे धोरण होते. १८५७ सालच्या बंडापासून ब्रिटिश सत्ताधार्यांरनी या दुष्ट राजनीतीचा पाठपुरावा केला होता. त्याला पाने आली होती, आणि प्रतिवर्षी भारतभर ठिकठिकाणी हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांचे भरघोस पीक ब्रिटिश सत्ताधार्यां च्या पदरात पडत असे.
भारतामधून ब्रिटिश सत्तेची उचलबांगडी झाली, की हिंदू-मुसलमान दंगेदेखील इतिहासात जमा होऊन जातील, या स्वप्नात आम्ही होतो.
चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ
संपादक आजचा सुधारक यांस,
स.न.वि.वि.
“संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये.” श्री. जोशी यांच्या मते मनूने या श्लोकाद्वारे स्त्रियांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले असून, आजच्या परिस्थितीत (‘मनूला बुरसट मानणार्याो व स्वतःला प्रगत मानणार्याा समाजाच्या संदर्भात) ‘मनूच्या या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच ठरवावे असा त्यांनी वाचकास कळकळीचा सल्ला दिला आहे.
स्वायंभुव मनूची ‘निष्कारण निन्दा?
मनु हा वस्तुतः स्त्रीद्वेष्टा नाही, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली नाहीत, पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला बंधनात जखडून ठेवले पाहिजे असे मनूचे मत नाही, तरीदेखील त्याच्या वचनांचा विपर्यास करून पुरोगामी अभ्यासक मनूची निंदाकरतात आणि मनुस्मृतीचे सखोल अध्ययन न करताच आपला अभिप्राय वाचकांच्या गळी, वेळोवेळी उतरवितात असे मत डॉ. के. रा. जोशी ह्यांनी ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ ह्याविषयी दोन लेख लिहून प्रतिपादन केले आहे. डॉ. जोशी ह्यांनी ज्या मनुस्मृतीचा कैवार घेतला आहे तिचे वास्तविक स्वरूप आपण आधी पाहू या.
इतर
मा. संपादक, आजचा सुधारक, यास
सा. न.
आपला एप्रिल १९९४ चा अंक वाचला. त्यातील ललिता गंडभीर यांनी दिलेल्या ‘गीता साने यांच्या पत्रास उत्तर’ मधील काही विचार खटकतात. त्या संदर्भात वे एकूणच स्त्री-मुक्ती चळवळीच्या संदर्भात पुढील विचार मांडावेसे वाटतात
पूर्ण स्त्री-मुक्तीच्या उपरोक्त व्याख्येमधील स्त्रीच्या लैंगिक शुद्धतेला अवास्तव महत्त्व देणे बंद हा मुद्दा खटकतो. यामुळे केवळ एका स्वैराचारी, बेबंद समाजाची निर्मिती होईल अशी भीती वाटते. तेव्हा स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेला महत्त्व देणे बंद करण्याऐवजी पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेबाबत स्त्री-मुक्तिवाद्यांनी व स्त्री-पुरुष समानतावाद्यांनी आग्रह धरावा असे वाटते.
गांधींचे सत्य
श्री. देशपांडे (दि. य.) यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानांतील सत्याच्या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर’ गूढ आणि अनाकलनीयच राहिला, त्या ऐवजी तो स्पष्ट व आकलनीय व्हायला हवा होता.
गांधींचा स्वतःचा ‘सत्याचा शोध त्यांच्या आत्मचरित्रांतील अवतरण देऊन, दि.यं.नी त्यावर निराशाजनक असा अभिप्राय दिला आहे.
God is Truth व Truth is God ही दोन वाक्ये ‘ईश्वराचे परिपूर्ण वर्णन’ म्हणून गांधींनी सुचवल्याचे सांगून, दि.य. ती वाक्ये असाधु व निरर्थक ठरवितात. अशी दुर्बोध भाषा वापरणारे लोक अप्रामाणिक असतात असे जरी दि.यं.ना
मुस्लिम निधर्मवाद्यांचे आंदोलन
जामिया मिलिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेतील एक प्राध्यापक श्री. मुशिरुल हसन यांनी आपल्याला होणार्या विरोधाला न जुमानता कामावर रुजू होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे. आपल्या कडव्या जातीयवादी विरोधकांशी झुंज घेताना अनेक वेळा त्यांना जी ससेहोलपट सोसावी लागली त्यामुळे थकून जाऊन, एकाकी पडल्याने आणि विशेषतः १९९२ च्या डिसेंबरमध्ये त्यांच्यावर जो शारीरिक हल्ला करण्यात आला त्यामुळे धास्तावून, सलमान रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाबद्दल दोन वर्षांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेली विधाने आणि लोकशाहीमध्ये मतभिन्नता असतानाही प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असावे याबद्दलचा धरलेला आग्रह यांच्यापासून ते परावृत्त होतील अशी त्यांच्या विरोधकांची अपेक्षा होती ती त्यांनी धुळीला मिळविली आहे.
बोहरा जमात आणि परिवर्तनवादी चळवळ
[‘दाऊदी बोहरा जमात आणि मानवी अधिकार’ या नावाच्या श्री. असगरअली इंजनिअर यांचा लेख मेनस्ट्रीम या नियतकालिकाच्या ५ मार्चच्या अंकात आला आहे. त्यावर ताहिर पूनावाला यांची पुढील प्रतिक्रिया मननीय आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार या गोंडस नावाखाली सूक्ष्म धर्मनिष्ठेचा प्रसार होत आहे. आणि हे प्रथमच होत आहे असेही नाही.]
सय्यदना हे सर्वोच्च धर्मगुरु असून ते ‘दाई’ म्हणवले जातात. ही दाई-(दावत) संस्था सुमारे ८ शे वर्षांपूर्वी इमाम तय्यब यांनी स्थापन केली. धर्मसत्तेच्या द्वारे राजसत्ता हस्तगत करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात प्रतिस्पर्ध्यांकडून जिवाला धोका उत्पन्न झाला असता इमामांना अज्ञातवासी होणे भाग पडले.
संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ (भाग ३)
मनू हा स्त्रीद्वेष्टा आहे, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली आहेत. पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी ‘स्त्री’ला बंधनात जखडून ठेवले पाहिजे, असे मनूचे मत आहे, अशी मनुस्मृतीच्या अनेक पुरोगामी अभ्यासकांची समजूत असून याविषयी वेळोवेळी ते सतत लिहून मनूविषयी आपला निंदाव्यंजक अभिप्राय वाचकांच्या गळी उतरविण्याची अविश्रांत खटपट चालू ठेवतात. मनूविषयीचे आपले हे मत मनुस्मृतीच्या सखोल अभ्यासावर आधारलेले आहे असेही ते सुचवितात. या विचारात मनूच्या स्त्रीविषयक विचारावर लिहिताना ‘पिता रक्षति कौमारे’ यानंतर पुढे १०-१५ श्लोक जरी वाचले तरी तेवढ्यावरूनही पुरुषांनी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवावे, स्त्रिया त्यांच्या स्वभावामुळे केव्हा व्यभिचारिणी होतील, याचा भरवसा नसल्यामुळे त्यांच्यावर जागता पहारा ठेवावा, कोणतीही सवड किंवा सवलत त्यांना देऊ नये, असे मनूचे म्हणणे असल्याचे आपले मत झाल्याचे ते मांडत असतात.