चर्चा -भक्ती हे मुल्य आहे काय?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ अंकात प्रसिद्ध झालेल्या “भक्ती हे मुल्य आहे काय?” या माझ्या लेखावर प्रा. बा. वि. ठोसर यांनी लिहिलेले एक चर्चात्मक टिपण याच अंकात अन्यत्र छापले आहे. हे टिपण लिहिल्याबद्दल मी प्रा. ठोसरांचा अतिशय आभारी आहे. कोणत्याही विषयातील सत्य त्याच्या साधकबाधक चर्चेशिवाय हाती लागत नाही ही गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून प्रा. ठोसरांच्या लेखाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
आपल्या लेखात प्रा. ठोसरांनी प्रथम कार्ल पॉपर या थोर तत्त्वज्ञाचे सार्थ (किंवा अर्थपूर्ण – meaningful) विधान आणि वैज्ञानिक विधान यासंबंधीचे मत उद्धृत केले आहे.

पुढे वाचा

चर्चा- भक्ती हे मूल्य आहे काय?

आ. सु. च्या डिसेंबर १९९४ अंकात “भक्ती हे मूल्य आहे काय?” हा प्रा. दि. य. देशपांडे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे भक्तीला आपल्या देशांत पुरातन कालापासून तो आजवर इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे की यासंबंधी केवळ विवेकवादांतूनच नव्हे तर सर्व दृष्टिकोनांतून सखोल चर्चा होणे हे अगत्याचे आहे.
हा लेख वाचल्यावर मनांत आलेले काही विचार, प्रश्न आणि शंका अशा : प्रथम लेखाच्या उतरार्धातील कांही विधाने घेतो. (१) “परंतु ईश्वर (मग तो कोणत्याही वर्णनाचा असेना) आहे असे मानायला कांही आधार आहे काय?

पुढे वाचा

सी. पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती” ह्या पुस्तकाच्यानिमित्ताने (उत्तरार्ध)

गेल्या वीस वर्षांतील ‘नवीन भौतिकीमुळे भौतिक शास्त्राच्या पारंपारिक कल्पनेतही महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ह्या बदलांचे वर्णन कॉलिनी पुढील शब्दांत करतो,क्वाँटम भौतिकी” “आणि “केआस थिअरी” सारख्या नवीन कल्पनांनी द्रव्याच्या (matter) गुणधर्माचे जुने जडवादी (mechanistic) रूप – जे न्यूटनपासून प्रचलित होते – टाकून द्यायला भाग पाडले आहे. शिवाय सैद्धांतिक भौतिकी (Theoretical Physics), खगोलशास्त्र (Astronomy) आणि विश्वरचनाशास्त्र (Cosmology) ह्यांसारख्या विषयांमधील क्रांतिकारक प्रगतीमुळे अनुभवजन्य निरीक्षणातून, अचूक निगमनाने नियंत्रित अनुमान काढण्याची जुनी वैज्ञानिक विचारपद्धतीही सदोष असल्याचे लक्षात आले आहे. रूपक, समरूपता, अंतःस्फूर्ती ह्यासारखे मानव्यशास्त्रात वापरले जाणारे मानसिक व्यवहार विज्ञानातही उपयोगी पडतात हे जाणवल्यामुळे ह्या दोन ज्ञानशाखांमधील साधम्र्याची चर्चा सध्या जास्त महत्त्वाची ठरू पाहात आहे.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही? त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:
आजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे.

पुढे वाचा

देव कसा आहे?

‘एथिओपियन लोक म्हणतात की आमचे देव बसक्या नाकाचे आणि काळ्या रंगाचे आहेत, तर श्रेसचे लोक म्हणतात की आमच्या देवांचे डोळे निळे आहेत आणि त्यांचे केस लाल आहेत. आणि जर गुरे, घोडे किंवा सिंह यांना मनुष्यासारखे हात असते, त्यांना चित्रे काढता आली असती, आणि मूर्ती कोरता आल्या असत्या, तर घोड्यांनी आपले देव घोड्यांसारखे आणि गुरांनी गुरांसारखे चितारले असते, आणि प्रत्येक पशूने आपल्या देवाच्या शरीरांना आपापल्या शरीराचा आकार दिला असता.’
(इ. पू. ५००)

संपादकीय

आजचा सुधारकच्या स्तंभांमधून अधूनमधून अन्यत्र प्रकाशित झालेला मजकूर पुनःप्रकाशित होत असतो. असा मजकूर कधीकधी आमच्या पुष्कळ वाचकांच्या वाचनात आलेला असतो. मग असा मजकूर पुन्हा प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न आमच्या काही वाचकांनी उपस्थित केला आहे.
लेखकाला प्रसिद्धी देणे हा त्यामागचा हेतू नाही हे स्पष्टच आहे कारण तो लेख ज्याचा प्रसार पुष्कळ मोठा आहे अशा नियतकालिकातून घेतलेला असतो. तो केवळ वाचनीय असतो म्हणून नव्हे तर त्यातील आशय चिंतनीय-मननीय असतो, त्यातून समाज परिवर्तनाची आणखी एखादी समस्या अधोरेखित होत असल्यामुळे तो संग्राह्य होत असतो, म्हणून तो पुनःप्रकाशित केला जातो, हे सांगण्याची गरज आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार -आस्तिकतेचे मंडन व खंडन

आजचा सुधारक, जानेवारी १९९५ च्या अंकातील प्रा. रेगे व प्रा. देशपांडे ह्या दोघांचेही लेख वाचले. तुल्यबल युक्तिवादकांचे युक्तिवाद प्रयत्नपूर्वक समजून घेण्यात ‘बौद्धिक व्यायाम झाला व सात्त्विक करमणूकही झाली.
प्रा. रेगे यांचा अनुभव मला सहज समजला. कारण तोच अनुभव मीही घेतलेला आहे. प्रा. देशपांडे यांचा युक्तिवादही मला समजला. कारण स्वानुभव क्षणभर बाजूला सारून मी ही आस्तिकतेच्या विरोधात तोच युक्तिवाद करीन.
‘यो यच्छूद्धः स एव सः’ हे वचन आठवले. प्रा. रेग्यांचा श्रद्धाविषय ‘स्वाभाविक श्रद्धा आहे. प्रा. देशपांड्यांचा श्रद्धाविषय तर्कशुद्ध अश्रद्धा’ हा आहे. त्यामुळे ह्या दोघांचे एकमत होणारच कसे?

पुढे वाचा

नागरी (मराठी) लिपीत काही सुधारणा निकडीच्या

नागरी लिपी अनेक दृष्टींनी अतिशय समर्थ आणि सोयीची लिपी आहे यात संशय नाही. पण अन्य भाषांतील काही उच्चार मराठीत नसल्याने त्यांचे नागरीत बिनचूक लिप्यंतरकरता येत नाही, आणि लिप्यंतर चुकीचे झाल्याने मूळ उच्चारांहून वेगळे चुकीचे उच्चार मराठी भाषी लोकात रूढ होतात, एवढेच नव्हे तर मूळ उच्चार कसे होते याही बाबतीतआपण अज्ञ राहतो.
– १ –
संस्कृत व्याकरणानुसार वर्णाचे उच्चारणस्थानानुसार पाच वर्गात विभाजन केले जाते. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. मराठीत मात्र काही वर्ण दंत्यतालव्यही आहेत. उदा. च, छ, ज, झ ह्या वर्णाचा उच्चार मराठीत दोन तन्हांनी केला जातो.

पुढे वाचा

जडवाद, इहवाद, स्त्रीमुक्ती, वगैरे

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ च्या अंकात श्री दि.मा. खैरकर यांचा ‘दिवाकर मोहनींच्या स्त्रीपुरुषसंबंधाच्या भ्रामक कल्पना’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या शेवटच्या छेदकात त्यांनी काही तात्त्वज्ञानिक सिद्धांतांचा आणि संकल्पनांचा उल्लेख केला आहे.जडवाद, चैतन्यवाद, अदृष्ट इत्यादि गोष्टींसंबंधी त्यांनी लिहिलेला मजकूर वाचल्यावर या सर्वच गोष्टींसंबंधीचे त्यांचे प्रतिपादन बरेचसे गैरसमजावर आधारलेले आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्या कल्पनांचे वास्तव स्वरूप काय आहे हे सांगणे अवश्य वाटल्यामुळे पुढील चार शब्द लिहिले आहेत.
खैरकर म्हणतात की दिवाकर मोहनी जडवादी आहेत. पण मोहनींच्या लिखाणात मला जडवादाचे चिन्ह सापडले नाही.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय -भारतीय मुसलमान : शोध आणि बोध

सेतुमाधवराव पगडी थोड्या दिवसांपूर्वी वारले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा असा विचार होता. पगडींची ग्रंथसंपदा मोठी. निवडीचाप्रश्न पडला. तो गेल्या निवडणूक निकालांनी सोडवला. आन्ध्र आणि कर्नाटकात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विरोधकांच्या विजयामागे मुस्लिम मतांचा झुकाव किती महत्त्वाचा होता हे प्रणय रॉय आणि मित्रांनी केलेल्या विश्लेषणात टक्केवारीनिशी दाखवून दिले.
भारतीय मुसलमान हा भारतासमोरील अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी आधी नीट समजून घेणे जरूर आहे. आम्ही वेगळे आहोत, आमचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी मुस्लिम नेतृत्वाची भूमिका दिसते.

पुढे वाचा