गांधींचे सत्य – डॉ. उषा गडकरींना उत्तर

‘गांधींचे सत्य- एक प्रतिक्रिया’ या लेखात डॉ. उषा गडकरी यांनी माझ्या ‘गांधींचे सत्य’ या लेखातील माझ्या प्रतिपादनावर अनेक आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप एकतर चुकीच्या माहितीवर आधारलेले आहेत, किंवा गांधीजींच्या वचनापेक्षाही अधिक दुर्बोध अशा भाषेत लिहिले आहेत. केवळ तीन पानांत त्यांनी इतके मुद्दे उपस्थित केले आहेत की त्या सर्वांना उत्तरे देण्याकरिता त्याच्या अनेकपट पाने खर्ची घालावी लागतील. म्हणून त्यातील प्रमुख मुद्द्यांना संक्षेपाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
(१) प्रथम existence आणि subsistence या दोन प्रकारची अस्तित्वे मानणाच्या लोकांच्या मताविषयी. काही तत्त्वज्ञ स्थलकालात असलेल्या वस्तूंनाच अस्तित्व आहे असे मानतात; परंतु अन्य काही तत्त्वज्ञ (उदा.

पुढे वाचा

ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक?

आम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.
प्रा. दि. य. देशपांडे
देव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का? विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे?
सुभंत रहाटे
रोहिणी सदन, कैलासनगर
वर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग २)

आजचा सुधारक ऑगस्ट १९९४ च्या अंकात मी एका प्रक्षोभक विषयाला हात घातला होता.

त्यात स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मानाने वागविणे, तिच्या विवेकशक्तीचा आदर करणे, तिच्या कोणत्याही (यामध्ये योनिविषयक वर्तनही आले) वर्तनामधील औचित्यानौचित्याविषयी तिला स्वतन्त्रपणे निर्णय करता येतो असा विश्वास तिच्या स्वतःच्या व इतरांच्या ठिकाणी निर्माण करणे ह्या गोष्टींचा मी ओझरता उल्लेख केला होता. आज त्याचा थोडा विस्तार करावयाचा आहे.

स्त्रीमुक्तीविषयी आमच्या सगळ्यांच्या मनांत पुष्कळ गैरसमज आहेत. माझा मागचा लेख वाचून झाल्यावर मला पुष्कळ लोक भेटले. पत्रे फार थोडी आली. त्यांपैकी एका पत्राचा काही अंश मी पुढे उद्धृत करणार आहे.

पुढे वाचा

दिवाळीतल्या गाठी भेटी

दिवाळीची आकर्षणे अनेक असतात. वयपरत्वे ती बदलतात. एक आकर्षण मात्र बहुतांश कायम आहे. दिवाळी अंकांचे. मात्र त्यातही आतला एक बदल आहेच. पूर्वी वेगळं साहित्य खुणावायचं, आता वेगळं. पूर्वी वेगळी अन् अनेक मासिकं घ्यावी वाटायची, आता त्यातली काही अस्ताला गेली; काही नाममात्र आहेत. काहींचा डौल मात्र तोच कायम आहे. वयपरत्वे अंगाने थोडी झटकली इतकेच. मौज, महाराष्ट्र टाइम्स, दीपावली हातात पडली की खरी दिवाळी सुरू होते. यंदाच्या दिवाळीत लक्षात राहाण्यासारखं पुष्कळ वाचलंय पण मनात घर करून बसलेल्या तीन लेखांविषयीची वाचकांना ओळख करून द्यायची आहे.

पुढे वाचा

उत्तमतेच्या समर्थनार्थ

पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.
संपादक

‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘In Defense of Elitism’ आणि लेखक आहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक लिखाण करीत असत. हे त्यांचे पुस्तक अमेरिकन समाजाबद्दल आहे आणि त्यांच्या अकाली निधनानंतर ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुस्तकाची आणि लेखकाच्या वैचारिक दृष्टिकोणाची प्राथमिक ओळख करून देताना म्हटले आहे, “माणसाच्या ज्या बौद्धिक गुणांना हेन्री महत्त्वाचे मानत त्यांच्या सध्या होत असलेल्या कोंडीचा ते निषेध करतात.

पुढे वाचा

सत्य परिस्थितीला सामोरे जा

प्रत्येक देशामध्ये इतिहासात व वर्तमानकाळात अन्याय्य घटना घडलेल्या असतात. तसेच सर्वच धर्मात व धर्मग्रंथांत असहिष्णू व अन्यायी विधाने असतात. (ह्या नियमाला बौद्धधर्म अपवाद असावा.) ह्या घटना अथवा विधाने मान्य करण्याऐवजी त्या घटना तशी घडल्याच नाहीत” किंवा “घडले ते योग्यच होते” किंवा “अन्यायकारक विधानांचा अर्थच वेगळा आहे” अशा धर्तीचे समर्थन काही देशाभिमानी व धर्माभिमानी करतात. डॉ.के. रा. जोशी यांच्या लेखातले मनुस्मृतीच्या स्त्रियांबद्दलच्या भूमिकेचे समर्थन मला याच धर्तीचे वाटले. (हा लेख वाचून जोशी यांच्या मते समाजातील शूद्रांच्या स्थानाबद्दल मनुस्मृतीत काय विधाने आहेत हे समजून घेण्याचे मला कुतूहल वाटू लागले आहे.)

पुढे वाचा

विचारकलह आणि प्रगती

बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता? दुष्ट आचाराचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशात हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे व बहुधा आमचे लोक गतानुगतिकच असल्यामुळे, हे भरतखंड इतकी शतके अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे. हा दुष्ट कलह विकोपास जाऊ न देण्याविषयी मात्र खबरदारी ठेवली पाहिजे. नाहीतर त्यापासून पुढे खऱ्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो. सुधारक आणि दुर्धारक, चपळ सुधारक आणि मंद सुधारक, थंडे सुधारक आणि गरम सुधारक, अथवा नाना प्रकारच्या मतांचे जुने आणि नवे लोक यांमध्ये सांप्रतकाली जी दुही माजून राहिली आहे ती पाहून घाबरून जाण्याचे किंवा देशावर काही प्रचंड संकट गुदरणार आहे, असे मानण्याचे बिलकूल कारण नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. सम्पादक आजचा सुधारक यास
स.न.वि.वि.
ऑगस्ट ९४ च्या आजच्या सुधारकमध्ये श्री. पळशीकर ह्यांचे ‘निसर्गाकडे परत चला ह्या मथळ्याखाली आजचा सुधारकमध्ये दिलेल्या अवतरणाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त – करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी रसेल यांचे “अडाणीपण” वऔद्धत्य” वरील अवतरणात व्यक्त झाले आहे असा आरोप केला आहे. वस्तुतः पळशीकरांच्या प्रतिक्रियेवरून त्यांचा रसेलच्या विचारांशी फारसा परिचय नाही व त्या विचारापुरते तरी त्यांचे मतप्रदर्शन हे “अडाणीपणाचे” व “औद्धत्याचे आहे असे म्हटल्यास अन्यायाचे होणार नाही. लाओत्से, रूसो, रस्किन व म. गांधी यांची “निसर्गाकडे चला” ही पुकार तत्कालीन परिस्थितीला उचित होती असे पळशीकरांचे म्हणणे.

पुढे वाचा

चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत.

पुढे वाचा

पर्यावरणवादाचा अन्वयार्थ

(१)
मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग असा मानवसापेक्ष दृष्टिकोन होता. सुरुवातीला निसर्गातील उर्वरित घटकांच्या तुलनेत माणसाचे अस्तित्व नगण्यच होते. मानवासकट सर्वघटकांची एक व्यवस्था म्हणजे पर्यावरण ही मानवनिरपेक्ष संकल्पना अलीकडली आहे.
ह्या संकल्पनेचा विकास अपरिहार्यपणे आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित आहे.

पुढे वाचा