ना सरकारी कलेक्टर, ना कमिश्नर— पण जबाबदार शहरे

न्यूझीलंडचा अनुभव: नगरसेवकांद्वारे प्रशासनप्रमुखाची नियुक्ती, मुद्रांकशुल्काचा अंत आणि स्वायत्त पोलिसव्यवस्था

मेरी रिचर्डसन न्यूझीलंडमधील आधुनिक शहर (स्मार्ट सिटी) क्राइस्टचर्च येथे महानगरपालिकेच्या प्रशासनप्रमुख आहेत. कार्यक्षमता, आर्थिक शिस्त आणि सुधारीत प्रशासन ह्यांवर भर देत त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा झाल्या. सन २०२५ मध्ये त्यांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. मात्र “सध्या अनेक नागरिक आर्थिक दबावांचा सामना करत आहेत,” असे सांगत त्यांनी ही पगारवाढ आदरपूर्वक नाकारली.

आपल्याकडील शहरांमध्ये प्रशासनप्रमुख म्हणून महानगरपालिका आयुक्त कार्यरत असतात. परंतु आपल्याकडील आयुक्त आणि मेरी रिचर्डसन ह्यांच्या पदातील मूलभूत फरक लक्षात घ्यायला हवा.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’चा हा अंक वाचकांपुढे आणता आला, ह्यामागे एक सुरस पार्श्वभूमी अशी…

कुठल्याही अंकासाठी एरवी महिनाभर आधी पाठवले जाणारे आवाहन ह्यावेळी पाठवलेच गेले नाही. माणूस आहे, चुका होणारच, असे म्हणून सोडून देता येत असले तरी वाचकांप्रति उत्तरदायित्व तर असतेच. तेव्हा दहा दिवसांच्या मर्यादित काळात जे लेख येतील, ते घ्यावे आणि लेखांची संख्या अगदीच कमी वाटली, तर जुन्या लेखांच्या साठ्यातून काही निवडून घ्यावे, असे ठरवले.

परंतु, मिळालेला प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धक ठरला. बरेच तात्कालिक विषय हाताळले गेले. पंतप्रधानांनी मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर नव्याने केलेल्या विधानाला प्रतिसाद म्हणून लेख आले.

पुढे वाचा

जणूचा प्रवास

कोमल गौतम २०२४ पासून लर्निंग कंपॅनिअन्सच्या चक्रीघाट सेंटरवर टीचिंग फेलो म्हणून काम करते. नागपूर जिल्ह्यातील खेतापूर या छोट्याश्या गावातून आलेल्या कोमलने डी.एड. करीत असतानाच गावाजवळील शाळेत लहान मुलांना शिकवणे सुरू केले होते. परंतु तिथे खूप अडचणी येत होत्या. मोकळेपणाने काम करणे शक्य होत नव्हते. मुले तर मोकळेपणाने शिकू शकत नव्हतीच, ती स्वतःही नवे काही शिकते आहे का, पुढे जात आहे का, हे पाहू शकत नव्हती. दरम्यान, लर्निंग कंपॅनिअन्सच्या फेलोशिप अंतर्गत तिची निवड झाली.
‘लर्निंग कंपॅनिअन्स’ भटक्या पशुपालक भरवाड समुदायातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात.
पुढे वाचा

देव, अनिवार्यता आणि मानवी अपेक्षा

२० डिसेंबर २०२५ ला लल्लनटॉपवर देवाच्या अस्तित्वावर एक सार्वजनिक वादविवाद झाला. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यातील दोन तास चाललेला हा संवाद बऱ्यापैकी संयत आणि आजच्या काळात दुर्मीळ असा होता. विशेषतः भारतात अशा विषयांवरील चर्चा बहुतेकवेळा गोंगाटात संपतात. इथे मात्र दोन्ही बाजूंनी दिलेल्या वेळांत मुद्दे मांडले, आणि शेवटच्या भागात प्रेक्षकांनी शांतपणे प्रश्न विचारले.

तरीही हा वाद ऐकताना सतत वाटत होते की दोघेही वक्ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या स्तरांवर बोलत होते. मुफ्ती शमैल नदवी देवाच्या अस्तित्वाकडे ‘कारण’ (reason), ‘अनिवार्यता’, ‘कार्यकारणभाव’ (causation) अशा संकल्पनांच्या आधारे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहत होते.

पुढे वाचा

पुनश्च मेकॉले

१८३५ मध्ये शिक्षणक्षेत्रात ब्रिटिश राजवटीने आणलेली ‘मेकॉले’ मानसिकता उलथून टाकण्याचा दहा वर्षांचा कृती-आराखडा पंतप्रधान मोदी ह्यांनी नुकताच आपल्या रामनाथ गोएंका व्याख्यानात मांडला. मेकॉले ह्यांनी इंग्रजी भाषा जनतेवर लादून त्यांच्यात ब्रिटिश लोकांची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे सांगून जपान, चीनप्रमाणे आपण भारतीय भाषांतून शिक्षण द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप सातत्याने पाठपुरावा करीत असलेल्या ह्या ‘मेकॉले मिथका’चा पर्दाफाश करण्यासाठी हा ‘पुनश्च मेकॉले’चा प्रपंच!
थॉमस मेकॉले ह्यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या १२ ऑक्टोबर १८३६ च्या पत्रातील काही भाग माध्यमातून फिरत आहे.

पुढे वाचा

मेकॉलेची शिक्षणपद्धती आणि भारतीयांवरील परिणाम

“मेकॉलेने एका झटक्यात हजारो वर्षांतील आमचे ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, जीवनशैलीला कचराकुंडीत फेकले होते. आपल्या संस्कृती, परंपरेचा आपल्याला गर्व असला पाहिजे. मेकॉलेने १८३५ मध्ये जो गुन्हा केला होता त्यास २०३५ मध्ये दोनशे वर्षे होतील. त्यामुळे, मेकॉलेने भारताला जी मानसिक गुलामी दिली त्यापासून पुढील दहा वर्षांत मुक्ती मिळवायचा संकल्प आपल्याला करायचा आहे.” असे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या रामनाथ गोएंका व्याख्यानात केले. ज्या मेकॉलेने ‘भारतीय दंड संहिते’चा मसुदा तयार केला, त्याच मेकॉलेला गुन्हेगार ठरवण्याची किमया पंतप्रधानांनी करावी, हा विसंगतीचा उत्तम नमुना आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – ॲप्पलातून

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत तो खांद्यावर टाकणार इतक्यात . . 

“Hello, राजन्!”

“ऑं? हे कोण बोललं?”

“मीच राजन्, हाच प्रेतात्मा, वेताळ!”

“आज तुला खांद्यावर टाकून स्मशानाच्या दिशेने चालू लागण्यापूर्वीच?”

“हो, म्हटलं तुला गोष्ट सांगून मग त्यावर प्रश्न विचारून तुझं मौनव्रत तोडण्यापेक्षा, तुला surprise देऊन आधीच तुझ्या मौनव्रताचा भंग करावा! आपल्याला आपली Free will वापरता येते का ह्याचा एक प्रयोग करून बघावा!

आता एवीतेवी तुझ्या मौनव्रताचा भंग झालाच आहे, तर सांग तुझंही मत. Free will असते की नाही आपल्याला?”

पुढे वाचा

चैतन्याचा प्रश्न

Culver City मधील This Is Not a Café.
संध्याकाळची वेळ. मोठ्या काचांपलीकडे रस्त्यावर रहदारी संथपणे सरकताना.
आत कॉफी मशीनची घरघर, आणि तीन जण एका कोपऱ्यातल्या टेबलवर.

सोमणे – समोर गरम मद्रास फिल्टर कॉफी.
कासवे – डबल एस्प्रेसो.
खेकडे – ओट मिल्क कॅपुचिनोवरच्या फेसात बोटे फिरवत.

सोमणे (फिल्टर कॉफीचा सुगंध नाकात शिरू देत, मग खिडकीकडे पाहत, नंतर कासवेकडे वळून) : कासवे, एक गोष्ट मी खूप दिवसांपासून पाहतोय. तुमच्या त्या तर्कवादी चर्चा, पेपर्स, मॉडेल्स, छान आहेत, पण त्यातचैतन्याला कुठे जागा आहे?

पुढे वाचा

तर्क, श्रद्धा आणि निखळ संवादाचे उदाहरण

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यात देवाच्या अस्तित्वाबाबत झालेली चर्चा एका धर्मसमूहातील व्यक्तीशी एक विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक व्यक्ती किती निखळ, सभ्य आणि तर्काधिष्ठित संवाद साधू शकते, ह्याचे उत्तम उदाहरण ठरते.

हा कार्यक्रम आयोजित करणारे, त्याचे मॉडरेटर सौरभ द्विवेदी, कार्यक्रमात सहभागी झालेले मुफ्ती शमैल नदवी, तसेच उपस्थित आमंत्रित वर्ग — ह्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे.

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी चर्चेचे स्वरूप निखळ आणि संयत ठेवले होते. प्रश्न तर्काचा होता, श्रद्धेचा होता, आणि धर्मव्यवस्थेशी निगडित आस्थेचाही होता. तरीही, त्याला गंभीर किंवा आक्रस्ताळे स्वरूप येऊ न देता चर्चा पुढे नेण्यात आली.

पुढे वाचा

विज्ञान – एक अनंत कथा

आपण गोष्टी ऐकत लहानाचे मोठे होतो. इसापनीती, रामायण, महाभारत, टारझन ह्यांसारख्या कथांमधून आपले बालपण फुलत जाते. लहानपणीच्या संस्कारामुळे पुढील आयुष्यात आपण गोष्टवेडे (Gossip Lover) होतो. कोणत्याही वयात रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा व विज्ञानकथा वाचाव्याश्या वाटतात. टीव्हीवर कौटुंबिक मालिकांमध्ये सासू-सून भांडणे, प्रेम-द्वेष चक्र, हास्यविनोद ह्यांचा मसाला वापरून मालिकांचे भाग वाढवले जातात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका ३१४७ भागांपर्यंत चालली. रामायण चालू असताना रस्ते ओस पडत. आयपीएल ही क्रिकेटमालिका कथांसारखीच लोकप्रिय झाली आहे. हे सर्व कथाप्रकाराच्या यशाचे नमुने आहेत.

आपल्या जगण्याचा मोठा काळ कल्पित कथांमध्ये रमण्यात जातो.

पुढे वाचा