विषय «इतिहास»

आत्मा आणि मानवी मेंदू

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।
(गीता अ. ३ श्लोक. ४२)
गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता लक्षात आले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद, उपनिषदे, गीता यांत नाही. एवढेच नव्हे तर तो बायबलात नाही, कुराणात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही.

पुढे वाचा

मन केले ग्वाही (भाग एक)

खिळखिळी लोकशाही

आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल संख्यात्मक, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे.
या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा एक प्रयत्न आहे, विस्कळीत, अपूर्ण, असमाधानकारकही. पण असे प्रयत्न करणे आवश्यकही वाटते.

शीतयुद्ध आणि त्यानंतर

एकोणीसशे नव्वदच्या आधीची पंचेचाळीस वर्षे सर्व जग शीतयुद्धाच्या छायेत होते. ताबडतोब आधीची पंधरा वर्षे ब्रिटनमध्ये (यूनायटेड किंग्डम) स्थितिवादी हुजूरपक्ष सत्तेत होता.

पुढे वाचा

बुरुज ढासळत आहेत… सावध

आजचं चंद्रपूर तेव्हा चांदा होतं. माझ्या बालपणी चांदा हे नाव रूढ होतं. नव्हे मनात तेच नाव घर करून होतं. चांद्याबद्दल अनेक आख्यायिका ऐकवल्या जात. चांदा फार मोठं आहे असं वाटायचं. बीएनआर या झुकझुक गाडीनं चांद्याला यायचो. गडिसुर्ला हे मूल तालुक्यातलं माझं गाव. गावच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरावर चढलं की दूरवर मूल दिसायचं. लहान लहान बंगले दिसायचे. डोंगराच्या पायथ्याशी आसोलामेंढाचा पाट वाहताना मनोवेधक वाटायचा. आंबराईत रांगेने उभी असलेली झाडी हिरवी गच्च वाटे. डोंगरावरून पूर्वेला नजर टाकली तर वाहणारी वैनगंगा नदी दिसायची. मार्कंड्याचं मंदिर दिसायचं.

पुढे वाचा

अमेरिकेचे राष्ट्रगीत

‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ)

एखाद्या देशाचे राष्ट्रगीत हे जणू त्याच्या इतिहासाचे प्रतिबिंबच असते. देशासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. राष्ट्रगीतांत जाणते- अजाणतेपणे ज्या घटकांचा उल्लेख केला जात नाही ते घटकही महत्त्वाचे असतात, नाही असे नाही.

पुढे वाचा

डाव्या पुरोगाम्यांचे इतिहासदत्त कर्तव्य

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अभूतपूर्व निर्णायक बहुमताच्या विजयाने आता देशात काय होईल याची रास्त चिंता पुरोगामी वर्तुळात व्यक्त होत आहे. ती समजून घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी देशाच्या आधुनिक इतिहासातील ३ प्रमुख प्रवाहांची प्रथम नोंद घ्यावी लागेल.

एक, स्वातंत्र्य चळवळीतून उदयाला आलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्यांना मानणारा, वंचितांना झुकते माप देणारा, मध्यममार्गी परंतु, निश्चितपणे भांडवली विकासाच्या दिशेने जाणारा प्रवाह. आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा हे द्वंद्व स्वातंत्र्य मिळाल्यावर निमाले व संविधानात या दोहोंतून आलेल्या मूल्यांचा समावेश झाला. या प्रवाहाचे प्रतिनिधित्व काँग्रेस परिवार (यात काँग्रेसमधून फुटून निघालेल्या गटांचाही समावेश आहे) करतो.

पुढे वाचा

युटोपियन सोशालिस्ट; रॉबर्ट ओवन

एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे कामगारांचे जगणे अधिकच दयनीय बनले. अगदी १० वर्षांची लहान मुले- मुली सुद्धा या कामात गुंतवली जात होती. आणि मग अशांवर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे कधीही न संपणारे सत्र सुरू व्हायचे.

पुढे वाचा

नेहरू नसते तर

(अनुवाद: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) इ.स. 2014 हे वर्ष जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यस्मरणाचे पन्नासावे वर्ष आहे. योगायोग असा की यंदा 14 नोव्हेंबरला त्यांची 125 वी जयंती आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महान् व्यक्तींपैकी इतक्या प्रेमादराने ज्यांची अजूनही आठवण काढली जाते असे नेहरूंसारखे महापुरुष विरळाच!

अर्थात आपल्याला हेदेखील विसरून चालणार नाही की त्यांच्या प्रदीर्घ व उज्ज्वल राजकीय कारकीर्दीत त्यांना बहुसंख्य देशवासीयांचे अलोट प्रेम मिळाले असले तरी आज मात्र देशातील अनेकजण भारतातील बहुसंख्य समस्यांबद्दल नेहरूंनाच जबाबदार धरतात. आता तर त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले आहे.

पुढे वाचा

न्याय म्हणजे काय ?

रोजच्या बातम्यांवर नजर टाकली की अन्यायाची जंत्री दिसते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील दोन वर्षांत सीरियात एक लाखाहून अधिक निरपराध लोक ठार मारले गेले. या वर्षाअखेर ३५ लाख लोक देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्वासित होतील; शिवाय २० लाखांना जगण्यासाठी या ना त्या स्वरूपाची तातडीची मदत लागेल. हा जगातला सध्याचा मोठा नरसंहार. इजिप्तमध्ये ऑगस्टमध्ये लष्कराने हजारो लोक ठार मारले. नायजेरिया- काँगो-पाकिस्तान-अफगाणिस्तान येथे गेली अनेक वर्षे रोजच्या कत्तली चालू आहेत. श्रीलंका-ब्रह्मदेशात वांशिक संघर्ष, भारतात शासन-नक्षलवादी संघर्ष, दलित व स्त्रियांवरील अत्याचार, रोजचे हुंडाबळी यांत खंड नाही.

पुढे वाचा

हेरगिरी आणि शहाणपण

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रेट ब्रिटन (यापुढे ‘ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’) ही जगातली एकमेव महासत्ता होती. एकोणिसावे शतक संपताना तिचे साम्राज्य विरायला लागले; कुठेकुठे तर फाटायला लागले. पहिल्या महायुद्धाने इंग्लंडला स्पर्धक उत्पन्न होत आहेत हे अधिकच ठसवले. ते युद्ध जिंकायला इंग्लंडला यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची (यापुढे ‘अमेरिका’) मदत लागली, आणि अमेरिका महासत्ता आहे हे जाहीर झाले.
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४-१८) मध्यावर युरोपच्या पूर्व टोकाला एका नव्या देशाचा उदय झाला, यूनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यापुढे ‘सोव्हिएत रशिया’). जुन्या झारवादी रशियन साम्राज्याचा वारस असलेला हा देश अनेक अर्थांनी ‘न भूतो’ असा होता.

पुढे वाचा

इतिहासाच्या पुनर्लेखनातले धोके

अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्रीयुत सूरजभान यांच्या काही कल्पना विचित्र आहेत. भारतीयांना इतिहासाशी काही घेणेदेणे नाही, या मताला त्या कल्पना दुजोरा देतात. सूरजभान सांगतात की सर्व पुस्तकांमधून दलितांची हेटाळणी करणारे उल्लेख काढून टाकायला हवेत. याची सुरुवात म्हणून संत तुलसीदासांच्या रामचरितमानसातील प्रसिद्ध ओळी
“ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी ये सब ताडन के अधिकारी” गाळाव्या, असे सूरजभान सुचवतात.

आता वरील ओळी खेडूत, दलित, पशू आणि स्त्रियांना अपनामास्पद आहेत, हे तर खरेच आहे. ढोल बडवावा तसे या साऱ्यांना बडवावे, असे त्या सांगतात.

पुढे वाचा