डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा.
शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने आत्याकडे काढायला. आत्याला सोबत करत प्रवचन ऐकायला जातो. एका मुलीच्या प्रेमात पडतो. मिनिस्टरांना भेटून मुलीचा हात देण्याची विनंती करतो. मिनिस्टर म्हणतात, “माझ्या मुली म्हणजे माझे डावे-उजवे हात.
विषय «तत्त्वज्ञान»
मनाचिये गुंती
आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय करून टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगणेही मुष्कील करून टाकणारी ही चिंता (anxiety) दूर करण्यासाठी व किंचित काल तरी तीपासून सुटका करणारी अशी उपाययोजना मग माणसे शोधू लागतात. मुक्तीचे हे मार्ग मात्र दुखण्यापेक्षा जालीम ठस्न जास्तच गंभीर अशी दुखणी होऊन बसतात.
तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल
रसेल यांना जर कुणी विचारले असते – रसेल यांचे नाव केवळ उदाहरणादाखल आहे की, तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्रश्न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून मी माझे स्वतःचे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कुणीही लहान मोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते.
उपयोगितावादाचे टीकाकार
उपयोगितावाद म्हणजे काय याविषयी आजचा सुधारक या मासिकात आजपर्यंत अनेक वेळा लिहून झाले असल्यामुळे त्याच्या टीकाकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचारही अनेक वेळा केला गेला आहे. परंतु आज एक नव्या आक्षेपाचा विचार करायचा आहे. त्यामुळे त्याच्यावर घेतल्या गेलेल्या जुन्या आक्षेपांचा विचार त्रोटकस्याने केला तरी चालण्यासारखे आहे असे मी धस्न चालतो. उपयोगितावादावर गेल्या शंभरावर वर्षांत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. पण त्यापैकी बरेच आक्षेप शाब्दिक आहेत, आणि अनेक गैरसमजावर आधारले आहेत. उदाहरणार्थ एक आक्षेप असा होता की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे जे उपयोगितावादानुसार आपल्या कर्मांचे अंतिम उद्दिष्ट ते मुळात अशक्य आहे.
गतार्थ भारतीय वास्तुशास्त्र
भारतीय वास्तुशास्त्र शिल्पशास्त्राचे एक उपांग आहे. शिल्पशास्त्रात एकूण दहा विषय येतात व वास्तुशास्त्र हे त्यांतील एक. त्याचा विस्तार एकूण अठरा ऋषींनी अठरा संहितांत केलेला आढळतो. त्यातील कश्यप, भृगुव मय यांच्या संहिता जास्त प्रचलित आहेत. भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेमध्ये त्या पुरातन काळापासून प्रचलित असल्याने आजही आपल्याला दक्षिणेकडील संहितांचाच प्रचार होतानाआढळतो.
शिल्पशास्त्राच्या विस्तारात वजने, मापे, पदार्थवत्यांचे गुणधर्म, त्यावर करावयाच्या प्रक्रियाव त्यापासूनचे फायदे तोटे हे विस्ताराने येतात, व वास्तुशास्त्राला पण ते लागू होतात. ह्या एका बाबतीत पुरातन वास्तुशास्त्र हे आजच्या बांधकामशास्त्राची जननी म्हणता येईल. दिशा निश्चितीच्या प्रक्रिया, मोजमापाच्या पद्धती व गणिते, ह्याचप्रमाणे बांधकामाच्या संबंधात करावयाचे करार, त्यातील अटी, मुख्यापासून ते कनिष्ठापर्यंतव्यक्तींनी करावयाची कामेव त्यातील सूत्रबद्धता, त्यांना द्यावयाची दक्षिणा इत्यादि गोष्टीआजच्यापुढारलेल्या पद्धतींशी आश्चर्यकारकरीत्याजुळतात.
वैषम्यनैघृण्यप्रसंगनिरास
प्राचीन भारतात पहिल्या दर्जाचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते, आणि त्याची प्रमुख नऊ दर्शनांच्या (म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदान्त ही आस्तिक दर्शन आणि जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने यांच्या) शेकडो तत्त्वज्ञांकडून साधकबाधक चर्चा दीडदोन हजार वर्षे चालू होत्या. ती परंपरा गेल्या काही शतकांपूर्वी खंडित झाली असून सध्या जे उपलब्ध तत्त्वज्ञान आहे ते सामान्यपणे एकदीड हजार वर्षांपूर्वीचे आहे. इतक्या प्राचीन काळचा हा विचार असल्यामुळे त्यात आजच्या दृष्टीने काही उणीवा आहेत. पण एरवी त्यांची बलस्थानेही आहेत.
या तत्त्वज्ञानाचे एक छोटेसे उदाहरण म्हणून शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यातील एक उतारा पुढे छापला आहे.
अज्ञेयवाद – एक पळवाट
ईश्वराच्या अस्तित्वाचे कसलेही प्रमाण सापडत नाही. त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धयर्थ केले गेलेले सर्व युक्तिवाद सदोष असून अनिर्णायक आहेत, असे दाखवून दिल्यावर ईश्वरवाद्यांचा पवित्रा असा असतो की, ईश्वर आहे हे जसे सिद्ध करता येत नाही, तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या बाबतीत अज्ञेयवादी आहोत. अज्ञेयवादी असणे ही प्रतिष्ठेची भूमिका आहे आणि ती स्वीकारणे तत्त्वज्ञाला शोभणारे असून विवेकाला धरून आहे, असे मानले जाते. म्हणून याबाबतीत खरी गोष्ट काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपल्याला असे दिसते की अज्ञेयवादाला श्रद्धा स्वीकरणीय असते, एवढेच नव्हे तर ती आवश्यक आहे असेही म्हणता येईल.
गूढवाद
विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्यातील युद्ध चमत्कारिक प्रकारचे राहिले आहे. अठराव्या शतकातील फ्रान्स आणि विसाव्या शतकातील रशिया हे देश सोडले तर सर्वकाळी आणि सर्व स्थळी बहुतेक वैज्ञानिकांनी आपापल्या काळातील सनातनी मतांची पुरस्कार केला होता. अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी काही त्या बहुतेकांपैकी होते. न्यूटन जरी एअरियन असला तरी अन्य सर्व बाबतींत त्याचा ख्रिस्ती धर्माला पाठिंबा होता. कूव्हिअर हा कॅथलिक सनातनीपणाचा नमुना होता. फॅरडे सँडिमनियन होता, परंतु त्या पंथातील चुका त्यालाही वैज्ञानिक युक्तिवादांनी सिद्ध होणार्याफ वाटत नव्हत्या, आणि धर्म आणि विज्ञान यांच्या संबंधाविषयीची त्याची मते कुणाही धर्मपीठीयाला वाखाणण्यासारखी वाटणारी होती.
मी आस्तिक का आहे?
कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.
मी आस्तिक का नाही?
प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.
‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती.