विषय «नीती»

कुंभोजकरांच्या लेखातील काही विसंगती

कुंभोजकरांचा गणिताचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे तर माहितीच असेल की एकदा १=२ सिद्ध केले की सिद्धतेच्या इतर पायर्‍यांमध्ये काहीही चूक न करताही कोणताही चुकीचा निष्कर्ष मांडता येतो. त्याच धर्तीवर, त्यांच्या लेखात काही पायर्‍यांमध्ये चुका आहेत, बाकीच्या फाफटपसार्‍याची दखल न घेता चुकीचे दावे पाहू. हे दावे अडवून धरले की बाकीचा साराच डोलारा कोसळतो.

“तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला.”

स्वतःला परमेश्वर समजणार्‍या व्यक्तीला नास्तिक म्हणू नये.

“त्या प्रत्येक स्तंभात ईश्वराचे वास्तव्य आहे अशी प्रल्हादाची श्रद्धा होती.”

त्यांच्याच लेखात पुढे उल्लेख आहे की “हिरण्यकश्यपूने पहिल्याच घावात खांबाचे तुकडे केले.

पुढे वाचा

विवेक

आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)

देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का?

पुढे वाचा

संविधान संस्कृती : विज्ञान व वैज्ञानिक

ईश्वर, अल्ला, गॉड ही मानवाने निर्माण केलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. माणसावर संस्कार करून त्याला काही प्रमाणात सदाचारी बनवण्यात ही संकल्पना इतिहासकाळात उपयोगी पडलेली असू शकते. या संकल्पनेसाठी संक्षिप्तपणे ‘देव’ हा शब्द वापरूया. देव या संकल्पनेच्या आधारेच मानवाने बराचसा मनोमय सांस्कृतिक विकासही केला. परंतु नंतरच्या काळात स्वतःच निर्माण केलेल्या देवाच्या लोभात माणूस इतका अडकून पडला की तो देवाचा गुलामच झाला. त्यामुळे देवाला आपणच निर्माण केलेले आहे हेही तो विसरला. देवस्तुतीच्या घाण्याभोवती झापडबंद पद्धतीने बैलफेऱ्या मारत राहिला. या बैलफेऱ्यांची सवय लागल्यामुळे त्याला मानवी विकासाच्या नव्या दिशाच दिसू शकल्या नाहीत.

पुढे वाचा

न्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन

ते म्हणाले की बलात्कार हा एक अश्लाघ्य

गुन्हा आहे.

त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

मग त्यांच्या लक्षात आले बरेचसे…

म्हणजे ९५ टक्के बलात्कार करणारे पुरुष असतात,

घनिष्ठ सबंध असलेले.

कदाचित नवरासुद्धा.

मग आता नकोच आवाज करायला!

त्यांचे बघा हे असंच आहे.

महागाई पेट्रोलची १ रुपयाने वाढली तेव्हा

त्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली.

राज्यकर्त्यांना वाटेल ते बोल लावले,

आपला लोकशाही हक्क बजावत ताशेरे झाडले.

आता पेट्रोलने १०० गाठली तर ते म्हणाले, 

“पगार नाही का वाढला

तर पेट्रोल वाढलं तर काय मोठंसं?”

तर ते सारे हा असा लोकशाहीचा सोईस्कर

हक्क बजावत आज राज्यकर्ते झाले

आणि मग…..

पुढे वाचा

न्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता

आज भारताची लोकसंख्याच इतकी आहे की जवळजवळ रोजच बलात्काराची बातमी वाचायला मिळते. बातमी आली की लगेच “पोलीस काय झोपा काढतात का?” अशी ओरड सुरू होते. आपल्याला कल्पना आहे का की संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) स्टँडर्ड्सनुसार दर १००,००० लोकसंख्येला २३० पोलीस असायला हवेत. भारतात पोलिसांची ही संख्या फक्त १२५ आहे. ही संख्या जगातील सर्वात कमी श्रेणीत मोडते. पोलीस कुठेकुठे आणि काय काय सांभाळणार? राजकारणी तर काय विचारता, तापलेल्या तव्यावर पोळी भाजायला एका पायावर तयार! लगेच सनसनाटी विधाने करतात की भारत ही जगाच्या बलात्काराची राजधानी आहे.

पुढे वाचा

बदलते नीतिनियम

माझ्यासाठी जिव्हाळ्याचा असलेला हा विषय गेली दोन वर्षे माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये जहाजावरचे अधिकारी म्हणून काम करण्यासाठी १९ ते २५ या वयोगटातल्या तरुण-तरुणींना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेचा प्राचार्य म्हणून मी सध्या काम करतो आहे. या कामाच्या निमित्ताने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये शिस्तीचे वातावरण प्रस्थापित करणे ही माझी जबाबदारी आहे. यासंदर्भात मला अनेकवेळा नीतिमूल्यांविषयी काही प्रश्न पडतात आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर या विषयावर सतत चर्चा करीत असतो. आमची ही संस्था निमलष्करी प्रकारचे शिक्षण देत असल्यामुळे तेथे शिस्तही तशाच प्रकारची कडक असावी अशी पारंपरिक विचारधारा आहे.

पुढे वाचा

मला भेटलेले गांधीजी

गांधीजींची माझी पहिली आठवण ३० जानेवारीची आहे. वर्ष १९८८. मी शाळेत होतो. प्राथमिक चौथीचा वर्ग. आईनं शाळेत जाण्यापूर्वी सांगितलं, “आज हुतात्मा दिन आहे. सकाळी अकरा वाजता भोंगा वाजेल. रस्त्यावर, जिथे कुठे असशील तिथे तसाच उभा राहा.” “कशासाठी?” मी विचारलं. “गांधीजींची स्मृती म्हणून,” तिनं सांगितलं. अकरा वाजता भोंगा वाजला. मी होतो तिथे रस्त्यात उभा राहिलो. ही गांधीजींची पहिली आठवण. गांधीजी यानंतर लवकर भेटले नाहीत. आता तीस जानेवारीला अकरा वाजता भोंगा वाजतो का? माहीत नाही. बऱ्याच वर्षांत ऐकला नाही. गांधीजी नाहीत. आईही नाही.

पुढे वाचा

नीतीचे मूळ

नीतीचे मूळ हे कुठल्याही गृहीतकाशिवाय सिद्ध करता येते असे माझे मत आहे. हा अर्थात तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा विषय. पूर्वी यास ईश्वरी वा पारलौकिक गृहीतकांचा आधार लागतो असे कित्येकांना वाटायचे. पण हळूहळू तसा आधार न घेता नीतिनियमांची मांडणी करता येणे कसे शक्य आहे यावर विचार सुरू झाला. यावर ‘आजचा सुधारका’त अतिशय उत्तम लेखमाला प्रकाशित झाली होती. https://www.sudharak.in/2003/03/3320/

प्रत्येक जीवित प्राण्याला काही तरी स्वाभाविक प्रवृत्ती असतात. स्वतःचे संरक्षण करणे ही एक मूलभूत प्रवृत्ती! यात खाणे, तहान भागवणे, संरक्षित ठिकाणी राहणे इत्यादि प्रवृत्ती अंतर्भूत आहेत.

पुढे वाचा

नीतिविचार

आधुनिकपूर्व काळातील नीतीचे स्वरूप
सामान्य बोलचालीत (Common Parlance) नीती म्हणजे ढोबळमानाने व्यक्तीच्या समाजव्यवहारातील वर्तणुकीचे नियम किंवा धारणा (Social Judgements) होय. त्या त्या संस्कृतीमध्ये वर्तणुकीचे ठराविक संकेत असतात. त्यांना त्या त्या समाजाची केवळ मान्यताच असते असे नाही; तर तसे वागण्यासाठी व्यक्तीला प्रोत्साहन दिले जाते, आणि न वागण्याबद्दल तिच्या वाट्याला निंदा येते. या संकेतांचा उगम रूढी, परंपरा, प्रथा किंवा धर्म यांत असतो. हे सामाजिक संकेत काळानुसार, तसेच संस्कृतीनुसार बदलत असतात. यालाच तत्कालीन नीती म्हटले जाते. 

आदिम काळात माणूस सर्वार्थाने स्वतंत्र होता. श्रेष्ठ-कनिष्ठतेचे कोणतेही मानवनिर्मित निकष असण्याचा तो काळ नसावा.

पुढे वाचा

नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:

१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे. 
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.

वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो. 

पुढे वाचा