विषय «नीती»

खट्टरकाकांची भगवद्गीता

प्रो. हरीमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील भगवद्गीता या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर देत आहे. या पुस्तकातील लेख १९५०च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.

‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापिठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते.

पुढे वाचा

नव्या समजुतीची गरज

नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्‍यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्‍यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.

सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्‍या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात.

पुढे वाचा

ती बाई होती म्हणुनी….

इंग्लंडमधल्या विपश्यनाकेंद्रात एका जर्मन साधक-गुरूची गाठ पडली. त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, “कोणताही आध्यात्मिक विषय शाळांमध्ये आणताना आम्हांला खूप परवानग्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुन्हा आम्हांला मूलतत्त्ववादाकडे जायचं नाही…कारण तुम्हांला माहीतच आहे…!” असं म्हणून ते खजील होऊन हसले. मला उगीचच अपराधी वाटलं… त्यांच्या अकारण अपराधी वाटण्याबद्दल…! खरं तर त्यांचा जन्मच हिटलरच्या अंतानंतर झालेला. कुठल्याही प्रकारे ते त्या अत्याचारी कालखंडाचे समर्थक असण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही त्यांचा चेहरा अपराधी झाला. जणु काही ‘हिटलरच्या देशातला म्हणून माझी मान आता कायमच शरमेने खाली राहणार,’ असं त्यांना म्हणायचं होतं.

पुढे वाचा

बलात्कार प्रतिबंधार्थ – एक सूचना पण एकमेव नव्हे

काही वर्षांपूर्वी, वर्षाअखेरीस, जपानच्या टोकिओ शहरात, सुमारे आठवडाभरच्या सुट्टीमुळे, विनाकाम अडकून पडल्याने, आम्ही शहरात पायी भटकून त्या शहरातील बरीच ठिकाणे (गिंझा, अखियाबारा, आदि) नजरेखालून घातली आणि तेव्हा तेथून मिळविलेली माहिती नंतर आमच्या मित्रांना सांगता ते आश्चर्यचकित झाले. कारण त्यांनी तेथील काही विभाग आमच्याएवढे नजरेखालून घातलेच नव्हते. मुंबईकराने राणीचा बागही पाहू नये, अगदी तसाच हा प्रकार.

असेच भटकत असताना आम्ही त्या शहराच्या आडवळणांनाही स्पर्शून आलो आणि आता अडचणीत सापडतो की काय असे वाटून घाबरून परतलो. अशाच एका ठिकाणी लैंगिक समाधानाची साधने विक्रीस होती व आसपास संबंधित विषयांचे व्हिडीओ दाखविणारे अड्डेही खुल्लमखुल्ल्ला होते.

पुढे वाचा

जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो,

इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..”

तुमचा आवडता
हेन

तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत होता. २० मे १९४०ला त्याने पुन्हा आईवडिलांना लिहीले:

“रसद म्हणून तुम्ही आणखी काही पेर्वीटीन गोळ्या पाठवाल, अशी आशा वाटते.”

त्यानंतर १९ जुलै १९४० रोजी त्याने आणखी एक पत्र लिहिले,

“जर शक्य असेल तर आणखी काही पेर्वीटीनपाठवा, प्लीज.”

पुढे वाचा

जागतिकीकरण आणि लैंगिकताविषयक बदल

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे.

नवे पर्व, नवे प्रश्न

नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार इ. घटकांमुळे खेड्यांतील व शहरांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्तीचळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन, असे मुद्दे सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता.

पुढे वाचा

हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून 27 फेब्रुवारी 2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या देशाने गेल्या पन्नास वर्षांत जेवढे म्हणून मुख्यमंत्री पाहिले त्यांत सर्वोत्तम मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचे शिफारसपत्र अडवाणींनी दिले. मोदींनी गुजरातेत यशस्वी केलेला प्रयोग भारतभरच्या गावोगावी आणि खेडोपाडी करू असा दृढसंकल्प तोगडियांनी व्यक्त केला.

पुढे वाचा

कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं?

स्त्री, अत्याचार, नकोशी, स्त्री-पुरुष नाते, हिंसा
—————————————————————————–

स्त्री आणि हिंसा हे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. काही प्रकारच्या स्त्रियांना, उदा. संतानहीन, विधवा, कुरूप –त्या‘तशा’ असल्यामुळे हिंसा भोगावी लागते. पण ‘तशा नसणाऱ्या’ स्त्रियांनाही कुठे सुटका आहे हिंसेपासून? आणि हिंसा करणारा पुरुष तरी ती करून सुखी, समाधानी असतो का? इत्यादी प्रश्नांचा वेध घेणारा लेख.
——————————————————————————

आमच्या गावाकडं सुगीचा हंगाम चालला होता. अशा वेळी बाया उडदामुगाच्या शेंगा तोडताना एकमेकींची फिरकी घेत राहतात. एका मैतरणीचा काळानिळा पडलेला ओठ पाहून बाजूची म्हणली, “काय गं, हे असं झालं ते प्रेमाचं म्हणावं की रागाचं?’‘

पुढे वाचा

युद्ध माझं सुरू

स्त्री, दुःख, हिंसा, बलात्कार, समस्या
—————————————————————————–
पुण्यात राहणारी लष्करातली उच्चपदस्थ महिला अधिकारी परळी वैजनाथहून परतत असताना तिच्यावर 2010 च्या एप्रिल महिन्यात चार दरोडेखोरांनी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर खचून न जाता तिनं या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर तिला न्याय मिळाला आहे. या चौघा नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालानं दिली आहे. या सहा वर्षांच्या कालखंडात तिला कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं, तिलाकाय काय सहन करावं लागलं, पोलिस खात्याचं सहकार्य कसं मिळालं या सगळ्याचा तिच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलून घेतलेला हा वेध…
—————————————————————————–
लष्करातली त्रेचाळीसवर्षीय उच्चपदस्थ महिला अधिकारी परळीवैजनाथच्या दर्शनाहून पुण्याला परतत असताना चार तडीपार गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पुढे वाचा

उंबरीच्या लीला

इंटरनेट आणि विशेषतः मराठी संकेतस्थळांवर सहिष्णुता नांदते आहे का? या प्रश्नाचा या जगाशी चांगला परिचय असणाऱ्या एकीने घेतलेला हा शोध. लेखिका ’ऎसी अक्षरे’ या संकेतस्थळाच्या एक संपादक आहेत.
——————————————————————————–

‘युनेस्को’ने भावना दुखावणं हा रोग जगातला सगळ्यात भयंकर रोग असल्याचं जाहीर केलं आहे; अशी पोस्ट फेसबुकवर दिसण्याची मी रोज वाट बघते.

थोडा श्रॉडिंजरी विचार करायचा तर – (श्रॉडिंजरचा सिद्धांत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात — श्रॉडिंजरी विचार म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ पण त्यात दोन्ही अश्वत्थामे जिवंत आहेत किंवा दोन्ही जिवंत नाहीत.) एक बाजू ही की, चहाटळ लोकही अशी पोस्ट लिहिणार नाहीत.

पुढे वाचा