विषय «नीती»

नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:

१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे. 
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.

वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो. 

पुढे वाचा

न्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य

या लेखाला मुख्य संदर्भ भारतातील गेल्या दशकातील घडामोडींचा आहे. साधारणपणे याच विषयावर एक लेख मी २०२२ जानेवारीच्या ‘आजच्या सुधारक’मध्ये लिहिला होता. त्या लेखात सांगितल्यानुसार न्याय ही सारभूत संकल्पना आहे; तर नीती ही न्यायाच्या दिशेने जाऊ पहाणारी नियमबद्ध प्रक्रिया. न्याय सापेक्ष (relative) असतो आणि त्याच कारणाने न्यायाची प्रक्रिया (नीती) सुद्धा सापेक्ष असते. याचा अर्थ न्याय-अन्याय या संकल्पना निरर्थक आहेत असे नव्हे. त्यामध्ये अधिक अन्याय्य आणि कमी अन्याय्य (किंवा कमी न्याय्य आणि अधिक न्याय्य) असा तरतमभाव करता येतो. हा तरतमभाव वापरून जेव्हा न्यायिक प्रक्रिया एका विशिष्ट संदर्भात पूर्त (पूर्ण) होते तेव्हा आपण न्याय झाला असे म्हणतो.

पुढे वाचा

न्यायाच्या दाराशी

एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहीत आहे की हा रस्ता न्यायाचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर..

पण हे काय? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला. मात्र आता समोर वळण दिसत आहे आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा.. 

चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते..

पुढे वाचा

न्यायासाठी संवाद आवश्यक

काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक लोकांचे जोडलेल्या हातांचे ईमोजी आले. एकाने मिच्छामी दुक्क्डम हा त्या दिवसाशी संबंधित प्राकृत वाक्यांश लिहिला. मी लिहिले ‘यु आर फरगिव्हन’. आता मागितली कोणी क्षमा तर आपणही करावं ना मन मोठं.

पुढे वाचा

विवाहबाह्य संबंध

सर्वांत प्रसिद्ध असं उच्चवर्गीयातलं विवाहबाह्य प्रेमप्रकरण होतं, अमिताभ व रेखा यांचं. पण अखेरीस त्यांनाही थांबावं लागलंच … कुटुंबासाठी, समाजासाठी. 

नियम कितीही केले तरी माणूस हा चुकतमाकतच जगत असतो. मोहमाया त्याला जाळ्यात ओढायचं काम करत असते. त्यात तो नकळतही सापडू शकतो. 

आवडता पदार्थ नाही का जरा जास्तच खाल्ला जातो आणि मग अपचनावरचं औषध घ्यावं लागतं. तसं कधीतरी एखादी परस्त्री किंवा परपुरुष आवडतो. योगायोगाने तिकडून सिग्नल मिळालाच तर सुरू होतो भेटीगाठींचा सिलसिला. संबंध पुढे जातात, वाढतात, प्रेमाची पूर्तता होते. 

ती झाली तरी चोरटेपणाचे अपराधगंड निर्माण होऊ शकतात.

पुढे वाचा

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २

“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.”  — Karl Marx

इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची जाणीव’ असल्याने तिचे स्वरूप ‘चिकित्सक’ होते. इतिहासाविषयीची ही तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा दोन दिशांनी झालेली आढळून येते. ह्या दोन दिशांतील मूलभूत भेद त्यांच्या मानवी प्रकृतीविषयक तत्त्वज्ञानात, तसेच इतिहास संशोधनाच्या रीतींमधील भेदांमध्ये आहे.

पुढे वाचा

न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा…! (एक संक्षिप्त आकलन)

पृथ्वीवरील मानवेतिहासातील आजवरचा सर्वांत भयानक व खतरनाक असा कोरोना व्हायरस नुकताच येऊन गेला आणि तो अजूनही आपले अस्तित्व अधूनमधून दाखवतच असतो. या कोरोना व्हायरसने जगातील असंख्य मानवदेह नष्ट केले असून अजूनही त्याचा हा प्रचंड प्रकोप त्याने पूर्णरूपेण थांबवलेला नाही. अशा या कोरोना व्हायरसपेक्षासुद्धा कितीतरी पटीने भयानक व खतरनाक असा एक व्हायरस गेल्या शतकापासूनच मानवेतिहासात आपले अस्तित्व नोंदवून हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. एवढेच नव्हे तर तो व्हायरस रोजच्यारोज आणखीन अपायकारक होत जात आहे. दुर्दैवाने बहुतांश मानवजातीला याची अजूनही पुरेपूर जाणीव झाल्याचे दिसून येत नाही.

पुढे वाचा

सार्वकालिकता – एक विचार

सार्वकालिकता अर्थात शाश्वतता ही मानवी जीवनाची एक जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू नेहमीच योग्य असते असे नव्हे. सार्वकालिकतेचा स्पष्ट अर्थ ‘कालसुसंगत’ असा व्यवहारात असता तर सार्वकालिकता या शब्दालाच योग्य अर्थ प्राप्त झाला असता. पण सार्वकालिकता या शब्दाचा बहुतांशी वेळा समाज व्यवहारात अर्थ घेतला जातो तो ‘पारंपरिक’ या अर्थाने. इथे मोठा घोटाळा होतो. कारण परंपरागत चालत आलेली कोणतीही गोष्ट जणू पवित्रच असते आणि त्याच्यामध्ये कदापि बदल करू नये असे समाजमन अर्थात बहुतांशी लोकांचे सांगणे असते. सार्वकालिक या शब्दाला जेव्हा परंपरागत या शब्दाचा अर्थ प्राप्त होतो तेव्हा समाजात अनेक प्रश्न, वाद तयार होतात.

पुढे वाचा

कलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व

वकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते.

पुढे वाचा

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक?

पुढे वाचा