विषय «समाज»

डाव्या चळवळीत धर्माचे स्थान

ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही
—————————————————————————
सध्याचे दिवस धर्माला अफूची गोळी मानून त्याच्यापासून दूर राहण्याचे नाहीत. ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारांच्या खूप जवळची आहेत. त्याचे नाते भांडवलशाहीशी जोडणे ही धनदांडग्यांची चलाखी आहे. धर्मातील पुरोगामी प्रवाहाशी नाते जोडले तर डाव्या चळवळींना अमेरिकन राजकारणातील कोंडी फोडता येईल असे प्रतिपादन करणारा लेख.
—————————————————————————
गेल्या काही दशकांत अमेरिकेत झडलेल्या सांस्कृतिक वादविवादांमध्ये तसेच दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांवर धर्माचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. त्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न पुढे आले आहेत. उदा.; सरकारी शाळांमध्ये धार्मिक प्रार्थना सक्तीची केली जाईल का?

पुढे वाचा

देवाच्या नावावर राजकारण नको

ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही

—————————————————————————
अमेरिकेत डाव्यांनी उदारमतवादी धर्माच्या बाजूचे राजकारण करावे असे सुचविणाऱ्या मताचा प्रतिवाद करणारी ही मांडणी
—————————————————————————

दोन हजार तेरा सालची गोष्ट. टेक्सास राज्यात गर्भपाताची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या एका विधेयकावर चर्चा सुरू होती. (ते विधेयक नंतर संमतही झाले.) त्या चर्चेत भाग घेताना सिनेटर डॅन पॅट्रिक अन्य सदस्यांना उद्देशून म्हणाले – “जर तुम्ही ईश्वराला मानता, तर देव इथे असता तर त्याने कोणाच्या बाजूने मत दिले असते ह्याचा विचार करा.”
हेच महाशय नंतर (देवाच्या कृपेने नव्हे, तर मानवी निवडणुकीच्या माध्यमातून) लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवडले गेले.

पुढे वाचा

तोपर्यंत प्रश्न राहतीलच!

गुजरात मॉडेल, अभिव्यक्तिस्वातंत्र्य

देशातील नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ, व कलाकार ह्यांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वरून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्नावर सध्या देशभर वादंग माजला आहे. ह्या संदर्भात अभिव्यक्तिस्वातंत्र्य व गुजरात मॉडेल ह्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुजराथचे रहिवासी असणाऱ्या एका सर्जनशील साहित्यिक व भाषातज्ञाचे हे वैचारिक मंथन..

जोपर्यंत भीती व आभास या दोन गोष्टी देशाची नजरबंदी करत राहतील, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जात राहीलच. कधी साहित्यिकांकडून, कधी चित्रपटकलाकारांकडून, कधी शास्त्रज्ञांकडून, कधी विद्यार्थ्यांकडून, आणि एके दिवशी संपूर्ण देशाकडून..
गेली साडेतीन दशके माझे वास्तव्य गुजरातमध्ये आहे. त्यातील पंधरा वर्षे, अलीकडे अलीकडे भारतभर गाजत असलेल्या ‘गुजरात मॉडेल’ला जवळून अनुभवण्यात मी घालवली आहेत.

पुढे वाचा

विवेकी विचारांची मुस्कटदाबी

पुरोगामी विचारांसाठी वाहिलेले दि न्यू रिपब्लिक हे अमेरिकन मासिक 1915 पासून प्रसिद्ध होत आहे. त्याच्या पहिल्या अंकात या प्रकारच्या मासिकाची समाजाला का गरज आहे याबद्दल संपादकाने या काळात आपल्याला सर्वनाशापासून वाचवण्याची, आपल्या दुःखावर फुंकर घलण्याची, आपल्याला संरक्षण देणारी शक्ती फक्त सुस्पष्ट विचारांना आहे असा उल्लेख केला होता. खरे पाहता यात अतिशयोक्ती नाही. काही जणांना स्पष्ट विचांराऐवजी भावनेला प्रतिसाद देणारे विचार आवडत असतील तर काहींना निर्मळ विचारांऐवजी पारंपरिक वा आज्ञासूचक विचार आवडत असतील. काही जण तर विचार करण्याऐवजी भावनेच्या आहारी जात कृती प्रवण होण्याच्या पावित्र्यात असतात.

पुढे वाचा

ठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन

इंग्रजी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय समाजजीवन क्रमाक्रमाने बदलू लागले. पऱ्यायाने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून महाराष्ट्रातही बदल सुरू झाले. यातील महत्वाचा बदल म्हणजे भारतीय माणूस मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेकडून आधुनिकतेकडे येऊ लागला. त्याचे कारणही यंत्रयुगाचे आगमन आणि अर्थव्यवस्थेने घेतलेले भांडवलदारी वळण हे होते. परिणामी आतापर्यंत मूक असणारे समाजघटक जाती घटक मुखर होऊ लागले. ते व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. संतांनी जातीमुळे होणाऱ्या कुचंबनेचा निर्देश केला होता. परमेश्वराच्या दृष्टीने कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही हे ठासून सांगितले होते. परंतु वास्तव जीवनामध्ये मात्र श्रेष्ठ कनिष्ठ भाव होताच.

पुढे वाचा

मानवी बुद्धी आणि ज्ञान

गीतेच्या तिसर्‍या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक आहे :

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।(गीता 3.42)

अर्थ: (स्थूल शरीराहून) कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. तर मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ असा “तो” आहे. इथे तो या सर्वनामाच्या ठिकाणी आत्मा अभिप्रेत आहे.
या श्लोकात श्रेष्ठतेची जी चढती भाजणी दिली आहे ती अचूक आहे. इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असायला हवे. तसेच मनावर बुद्धीचे. बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे.

पुढे वाचा

विवेकवाद विकसित करण्यासाठी…

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते.

पुढे वाचा

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…

महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे.

पुढे वाचा

समानतेचे अवघड गणित

समता, समानता आणि समरसता या संज्ञा-संकल्पना वरवर समानार्थी वाटल्या तरी त्यातील आशय आणि अन्वयार्थ वेगवेगळे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (1779) लिबर्टी (स्वातंत्र्य), इक्वॅलीटी (समता) आणि फ्रॅटर्निटी (बंधुत्व) या घोषणा एक तत्त्व म्हणून जगाच्या प्रगत इतिहासात रूजत गेल्या. परंतु त्या प्रत्यक्षात आणणे व्यक्तीगत व सामाजिक जीवनात सोपे नाही. किंबहुना अनेकदा समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना तर परस्परविरोधात जातात. बंधुत्व हे तर किती कठीण आहे हे खुद्द फ्रान्समध्येच दिसून आले आहे. बंधुत्वाच्या मुल्यात सहिष्णुता, सहृदयता आणि आदरभावना अभिप्रेत आहेत. फ्रान्समध्ये कृष्णवर्णीयांना, इस्लाम धर्मीयांना आणि अन्य संस्कृती-समुदायांना कसे वागविले जाते हे पाहिले की फ्रान्सनेच ही मूल्ये टाकून दिली आहेत हे दिसून येते!

पुढे वाचा

संघ बदलला की दलित विचारवंत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ.

पुढे वाचा