अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतीत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही होत आहेत. आधुनिक विज्ञानपरंपरेतून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याला मात्र एवढी दीर्घ परंपरा नाही. आपल्याला ज्ञान असलेले जग कसे अस्तित्वात आले याचा शोध वैज्ञानिक घेत आले आहेत; पण ते का अस्तित्वात आले असावे, किंवा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, अश्या प्रश्नांना विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न तुलनेने नवे आहेत. मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मानसशास्त्रासारख्या विषयाला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून स्थान मिळणे हीदेखील तुलनेने अलीकडची, म्हणजे गेल्या शे-दोनशे वर्षांतली घडामोड आहे.
विषय «इतर»
मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी
आपल्या देशातील मध्यमवर्गाने गेल्या शतकात सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीय शोधांपासून तर स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्रांत नेतृत्व पुरवले. वैचारिक क्रांतीच्या उंबरठ्यावर समाजाला ह्या मध्यमवर्गानेच नेऊन ठेवले. मात्र पुढे अचानक काय झाले… मध्यमवर्गीय सुखवस्तू झाले, केवळ व्यावहारिक यशाच्या मागे लागले आणि ते मिळताच आपली जबाबदारी पार पाडेनासे झाले. सामाजिक नीतिमत्तेच्या कालातीत मूल्यांना ते विसरले की काय? उच्चशिक्षणाचे भाग्य लाभलेल्या ह्या वर्गाने मिळकतीचे सोपे पण लबाडीवर आधारलेले मार्ग शोधून काढले, आणि त्यातच त्यांच्या अस्मितेची आहुती पडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण होण्याची गरज प्रतिपादन केली होती.
पाणी मागतात… च्यायला
लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता शेतीकरता
ठोकून काढलं पाहिजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं – अहो जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अनं ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
कान इकडं करा. तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले-इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही.
पैशाचे मला दिसणारे स्वरूप (२)
औद्योगिक क्रान्तीमुळे पडलेला फरक —
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. तिची बीजे मात्र त्यापूर्वी अंदाजे 500 वर्षे आधी पडली. गतानुगतिक विचारांतून इंग्लंडचे लोक बाहेर पडू लागले. ह्याचा पहिला पुरावा मॅग्ना कार्टा च्या स्वरूपात दिसतो. इंग्लंडच्या सरदारांनी मिळून राजाचे अधिकार सीमित केले, ह्याचा तो दस्तावेज आहे. आणखी काही वर्षांनी इंग्लंडने पोपचे वर्चस्व झुगारून दिले. ह्या दोन्ही घटना आपल्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात. चाकोरीबाहेरचा विचार करण्याचे आणि तो अंमलात आणण्याचे सामर्थ्य एका समाजाने समूहशः दाखविले. बहुतेक सारा यूरोपच सरंजामशाहीतून मुक्त होण्याची धडपड करू लागला.
नैतिक वास्तववाद्यांच्या शोधात
[डेव्हिड ब्रूक्सच्या सीकिंग मॉरल रिअॅलिस्ट्स (इंडियन एक्सप्रेस (14 एप्रिल 2012)/द न्यूयॉर्क टाइम्स ) या लेखाचा हा मथितार्थ.]
आजकाल बरेचदा चांगली सामाजिक कामे करत असलेले तरुण भेटतात जगातल्या गरीब देशांमधल्या प्रवासांतून त्यांना केवळ स्वतःत न गुंतता काही सामाजिक उद्योग करायचे सुचलेले असते. त्यांच्यात एरवी भेटणारा तुच्छतावाद नसतो, तर या युगाला नैतिक विचार देण्याची इच्छा असते. हे पाहून आपणही ताजेतवाने होतो. पण त्यांच्या या सेवाव्रतांत, सेवाधर्मांत काही त्रुटीही असतात.
एक म्हणजे त्यांना वाटत असते, की राजकारण टाळता येईल. त्यांना पायाभूत कामांमधूनच समाजात बदल होतात, राजकीय प्रक्रियेतून नाही, असे वाटते.
साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा
नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत प्रमुख होती ती आर्थर कॉनन डॉइलची शेरलॉक होम्स ह्या नायकाभोवती रचलेली पुस्तके.
सर आर्थर कॉनन डॉइल (१८५९-१९३०) पेशाने डॉक्टर होते, आणि त्यांना वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखा शिकायला आवडत असे.
अमेरिकेची दिवाळखोरी
[अमेरिकन शासनाला कायद्याने अंदाजे एका वर्षाच्या GDP इतकेच कर्ज घेता येते. काही दिवसांपूर्वी ही मर्यादा अमेरिकन काँग्रेसने वाढवून दिली, पण सशर्त. हडेलहप्पीने या शर्ती लादणारा रिपब्लिकन काँग्रेसमेनचा गट टी पार्टी या नावाने ओळखला जातो. त्यांची ही कृती दूरगामी परिणामांत घातक आहे असे अर्थशास्त्री एकमुखाने सांगत आहेत. हे पूर्ण प्रकरण समजावून सांगणारा लेख खांदेवाल्यांनी 7 ऑगस्ट 2011 च्या लोकशाही वार्ता साठी लिहिला. त्याचा संपादित भाग खांदेवाल्यांच्या पुरवणी मजकुरासोबत, देत आहोत. – सं. ]
अमेरिकन स्वप्न
दोन्ही जागतिक युद्धांमध्ये अमेरिका मुख्य घटक म्हणून गुंतलेला नव्हता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिप मंडळ : एक विचार
रोज सकाळी फिरायला जाताना मला एक वृद्ध जोडपे हातात हात घालून कधी पाठमोरे तर कधी समोरून येताना दिसते. मनातल्या मनात मी ‘जोडी अशीच अभंग राहो’ ही सदिच्छा व्यक्त करते. आयुष्याची अशी रम्य पहाट किंवा संध्याकाळ सगळ्यांच्याच वाट्याला येईल असे नाही. विवाह करून सहचराचा हातात घेतलेला हात कधीतरी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर सुटू शकतो अन् मग सुरू होते उर्वरित जीवनाची त्याची/तिची एकाकी वाटचाल! हे एकाकीपण सहन करणे, निभावणे खूप कठीण असते. पण त्याला पर्यायही नाही असे वाटत असतानाच वर्तमानपत्रातून ‘ज्येष्ठ व्यक्तींसाठी Live-in-relationship मंडळ’ स्थापन होणार अशी बातमी वाचनात आली.
मानवी अस्तित्व (३)
आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?
निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.
आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी (50 दशलक्ष) तारे असण्याचा अंदाज आहे.
सिंगापूर आणि टी-ट्वेंटी वृत्ती
” (इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्ता काही डावे विचारवंत म्हणून प्रसिद्ध (किंवा बदनाम!) नाहीत. परंतु त्यांनाही उच्चवर्गीयांचा भारतापुढचे प्रश्न सोडवण्याबाबतचा लोकशाही-विरोधी व्यवस्थापकीय दृष्टिकोन आवडत नाही. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर 25 जून 2011 ला अवर सिंगापूर फँटसी नावाचा एक लेख लिहिला. त्याचा हा सटीप वृत्तान्त.]
गुप्तांना गुंतवणूक संस्थांच्या पाचेकशे प्रतिनिधींपुढे आजचे भारतीय राजकारण यावर बोलायला पाचारण केले गेले. पुढ्यात आयआयटी/आयआयएम्समध्ये शिकून आलेले पाचेकशे जागतिकीकृत वित्तव्यवहारतज्ज्ञ होते. (‘शंभर डॉलर्सचे हर्मेस टाय ल्यालेले, डॉलर्समध्ये सात आकडी पगार घेणारे, छानछोकी गाड्या वापरणारे”)
गुप्तांनी IIT/IIM ह्या संस्थांमध्ये सुरुवातीपासून जात्याधारित आरक्षण असल्याचा उल्लेख केला.