विषय «इतर»

श्री. गोखल्यांचे ईश्वरास्तित्वाचे समर्थन

प्रा. विवेक गोखले आपल्या ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ (आ.सु. ८.७, पृ. २१२) या लेखात म्हणतात की नास्तिकांचा एक युक्तिवाद बिनतोड समजला जातो. पण तसा तो नाही. आणि त्यानुसार त्यांनी त्या युक्तिवादाचे एक खंडन सादर केले आहे.
नास्तिकांचा युक्तिवाद असा आहे : ईश्वरवाद्यांच्या ईश्वरस्वरूपाविषयी अनेक कल्पना आहेत. त्यापैकी ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु आहे ही एक आहे. पण असा ईश्वर असू शकत नाही, कारण जगात निर्विवादपणे अस्तित्वात असलेले प्रचंड दुःख आणि वरील वर्णनाचा ईश्वर यांत विरोध आहे. ईश्वर जर ईश्वरवादी म्हणतात तसा असता, तर जगात दुःख असू शकले नसते, कारण ते त्याच्या साधुत्वाला बाधक झाले असते.

पुढे वाचा

माणसाचा मेंदू मोठा का?

मेंदूच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी प्रमाण तपासले तर माणसाइतका मेंदू इतर फारच थोड्या प्राण्यांमध्ये आढळतो. एकदोन फुटकळ अपवाद सोडता प्रमाणाच्या निकषावर माणसाइतका ‘डोकेबाज’ कोणताच प्राणी नाही. माणसांचे मेंदू दीड-पावणेदोन किलोंचे असतात, आणि शरीरे साठ-सत्तर किलोंची. म्हणजे माणसांच्या शरीरांचा सव्वादोन-अडीच टक्के भाग मेंदूने व्यापलेला असतो.
माणसाचे सगळ्यात जवळचे नातलग म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे मानवेतर कपी. हे प्राणी आणि माणसे मिळून कपी (apes) हा वर्ग बनतो. या मानवेतर कपींमध्ये मेंदूचे प्रमाणमाणसांच्या थेट अर्धे, म्हणजे शरीराच्या एक-सव्वा टक्का येवढेच असते. चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी
जेव्हा माणसांचे पूर्वज या इतर कपीपेक्षा सुटे झाले, तेव्हा माणसांच्या पूर्वजांचे मेंदूही शरीराच्या एक-दीड टक्काच असायचे.

पुढे वाचा

स. ह., चौसाळकर आणि राष्ट्रवाद

स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत आहे.
राष्ट्रवाद ही प्रामुख्याने गेल्या तीन शतकांमध्ये उदयास आलेली अतिशय प्रभावी वगतिमान विचारसरणी आहे. आनुवंशिक तत्त्वाने चालत आलेल्या राजघराण्यांना किंवा दैवी आधार असल्याचा दावा करणा-यांना या तत्त्वज्ञानाने झुगारून दिले.

पुढे वाचा

सार्वजनिक स्वच्छता

आगरकरांनी स्नान, पोषाख इत्यादींवर लिहिल्याचे त्यांच्या साहित्यांतून आढळते. परंतु, सार्वजनिक स्वच्छतेवर लिहिल्याचे आढळले नाही. कदाचित् त्यांच्या काळी या विषयावर लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी.
सांप्रत सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती इतकी चिंताजनक झाली आहे की, त्यावर न बोललेलेच बरे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला इतकी अनास्था आहे की आपण गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. सुरत शहरात प्लेगसारख्या महामारीचा उद्भव झाल्यावर सुद्धा आपल्यावर कसलाही परिणाम झाला नाही. साठलेला कचरा, घाण, दुर्गंधी यामुळे प्लेगचा उद्भव होतो हे कारण समजल्यानंतर, सुरतमध्ये आणि देशातील अन्य शहरांमधे नगरपालिका, महापालिका, यांनी चार दिवस सफाई मोहीम राबविली, शासकीय फतवे निघाले, लोकांनी नाकातोंडाला फडकी बांधून रस्त्याने जाणे सुरू केले आणि कुठे एखादा मेलेला उंदीर सापडला तर तो परीक्षणासाठी कुठल्यातरी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.

पुढे वाचा

मुक्यांचा आक्रोश

शिक्षणाचे लोण पसरत आहे. त्याबद्दल विस्तार झाला, पण उथळपणा आला अशी तक्रारही आहे. तिच्यात तथ्यांश असेल, पण विस्ताराचे अनेक फायदेही आहे. उदा. दलित साहित्य, ते नसते तर समाजाचे केवढाले गट केवढी मोठी दु:खे मुक्याने गिळीत होते हे कळलेच नसते. मूकनायक निघायला शतकानुशतके लोटावी लागली.
भीमराव गस्ती यांचे बेरड हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले तेव्हा दलित आत्मकथांची पहिली लाट ओसरत चालली होती; म्हणून आपल्या कहाणीकडे लोकांचे लक्ष जाईल की नाही याची शंका लेखकाला होती. पण वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
‘सुखाची जात सर्वत्र एकच पण दुःखाच्या जाती अनंत हेच खरे’!

पुढे वाचा

आस्तिक्य आणि विवेकवाद

विवेकवाद म्हणजे अनुभव आणि तर्क यांच्याशी सुसंगत असेल तेवढेच स्वीकारणे आणि यांच्याशी विसंगत असणारे काहीही न स्वीकारणे.
ईश्वरविरोधी, विवेकवादी नास्तिकांची भूमिका अमान्य करता आली तर आपोआपच आस्तिकवादाची तर्कसुसंगतता सिद्ध होईल. आपण विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधात युक्तिवाद पाहू. हा युक्तिवाद त्यांना बिनतोड वाटतो.
विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधातील युक्तिवाद
नास्तिकांचा युक्तिवाद मुख्यतः आस्तिकांच्या भूमिकेतील विसंगतीवर बोट ठेवणारा आहे. त्यांचे म्हणणे असे की आस्तिकांची ईश्वरविषयक कल्पना ही मुख्यतः दुःखहर्या ईश्वराची आहे. जगातील विविध प्रकारचे आणि अपार असे दुःख पाहिले तर त्यापासून मुक्तता द्यायला समर्थ असा फक्त ईश्वरच असू शकतो अशी आस्तिकांची समजूत आढळते.

पुढे वाचा

गणित आणि बुवाबाजी

ऑयलरविषयी आख्यायिका
अठराव्या शतकात ऑयलर (Euler) नावाचा एक महान गणिती होऊन गेला. त्याच्याविषयी पुढील आख्यायिका प्रसिद्ध आहे. एका गणितात गति नसलेल्या नास्तिक पंडिताचा पाडाव करण्याची कामगिरी ऑयलरवर सोपविली असता तो त्या नास्तिक पंडिताला भर दरबारात म्हणाला, “महाशय,
(a + b*)/ n = x
म्हणून ईश्वर असतो. उत्तर द्यावे!”
नास्तिक पंडित गांगरला, उपस्थित दरबारी हसू लागले, व कामगिरी फत्ते झाली. गणिताचा दुरुपयोग
गणिताविषयी कित्येक माणसांच्या मनात असणार्यास भीतियुक्त आदराचा वरील आख्यायिकेत येन केन प्रकारेण वाद जिंकण्यासाठी वापर केलेला दिसतो. वस्तुत: वरील विशिष्ट समीकरणाचा ईश्वराच्या अस्तित्वाशी काहीही खास संबंध नाही.

पुढे वाचा

कावळे आणि कोकिळा

कावळ्याच्या घरट्यांत कोकिळा अंडी घालते. अंडी घालताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलून देते. कोकिळेची अंडी लवकर फुटतात व त्यातून लवकर पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू देखील सोबतएखादे कावळ्याचे पिल्लू असेल तर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. कावळा मात्र त्याला आपलेच पिल्लू समजून वाढवतो. पिल्लू मात्र वाढल्यावर सर्वार्थाने कोकिळाच होते, त्याच्यात कावळ्याचे कोणतेही गुणधर्म येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच आहेत.
आपल्या समाजालाही हा काक-कोकिल न्याय चपखलपणे लागू पडतो हे मात्र आपण लक्षात घेत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीची मुले आपल्या घरोघरी वाढत आहेत.

पुढे वाचा

विधवाविवाह चळवळ

ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, “तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस, परंतु या ९ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का?’ ईश्वरचंद्रानी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची कणव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवाविवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवणाच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला.
ही हकीगत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. आज ती आठवायचे कारण म्हणजे नुकतेच विधवाविवाह चळवळ हे पुस्तक हातांत पडले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे स.गं. मालशे आणि नंदा आपटे यांनी केलेल्या संशोधनावर आधारलेले हे पुस्तक त्याच विद्यापीठाच्या स्त्रीसंशोधन केंद्रातर्फे १९७८ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्याच्या जबाबदार्याश

“समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रुजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणान्यांच्या बाबत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रद्धांवर आघात करणाच्या लिखाणांच्याविषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणीच कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रद्धा जपायच्या, या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असतो! मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रद्धा कितीही दुखावोत, सहिष्णुतेने वागायचे – या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे.

पुढे वाचा