विषय «संघटना-व्यक्ती विशेष»

महानतेपलीकडे – महाराष्ट्रातील सामाजिक व वैचारिक योगदानाचे बहुआयामी मूल्यमापन

गौरवशाली/प्रभावशाली व्यक्तींची सूची – एक सामूहिक प्रयत्न

प्रत्येक समाजामधून संत, समाजसुधारक, राजकीय नेते, लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विवेकवादी, व्यावसायिक, कार्यकर्ते, खेळाडू, उद्योजक अश्या व्यक्ती वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे समाजाला आकार, दिशा देत असतात. ह्यांपैकी काहींनी कायदे घडवले आहेत, काहींनी समाजोपयोगी संस्था उभारल्या-वाढवल्या, काहींनी साहित्याद्वारे समाजातील प्रश्न चव्हाट्यावर आणले, काहींनी अन्यायाला थेट आव्हान दिले, काही केवळ स्वप्नरंजनात डुंबले. काहींनी प्रस्थापित समजुती तेवढ्या अधिक घट्ट केल्या; तर काहींनी अहितकारक, घातक समजुतींच्या विरोधात आंदोलनाचा/क्रांतीचा मार्ग स्वीकारला.

आपण ह्या सगळ्याकडे कशा नजरेने पाहतो? अश्या व्यक्तींना संबोधतांना आपण सहजपणे ‘महान’ हा शद्ब वापरतो.

पुढे वाचा

ग्रामीण बँकेची कथा – अखेर काळ आमच्या बाजूने होता ! 

बांगलादेश निर्मितीची ५३वी वर्षगाठ नुकतीच झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या धाडसी निर्णयाने आणि सॅम माणेकशॉ ह्यांच्या लष्करी नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला. तेथील जुलमी राजवटीविरोधात झालेल्या अलीकडील जन-विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना ह्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. ग्रामीण बँक संकल्पनेचे जनक मोहम्मद युनूस हे प्रमुख सल्लागार म्हणून आंदोलकांना मार्गदर्शन करीत आहेत. निम्न आर्थिक स्तरावरील स्त्रियांसाठी रोजगानिर्मिती करून देणाऱ्या त्यांच्या ग्रामीण बँक प्रकल्पाबद्दल त्यांना २००६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता.

मोहम्मद युनूस ह्यांची ‘Banker To The Poor ही ‘ग्रामीण बँक’ चळवळीची गोष्ट सामाजिक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने वाचलीच पाहिजे अशी आहे.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

पुढे वाचा

रॅशनल जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता.

पुढे वाचा

आटपाट नगर?

चेंबूर – ट्रॉंबेच्या वस्त्यांमधून प्रौढ साक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी 1989 पासून सहभागी आहे. ‘कोरोसाक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. ‘‘काम कसं चाललंय?”, ‘‘कसं वाटतं”?, ‘‘झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?’‘ अशा उत्सुक प्रश्र्नांबरोबर ‘‘सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’‘ ‘‘यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?”, ‘‘कसे राहतात ग हे लोक?”,

पुढे वाचा

दाटून येते सारे..

आयुष्याचा मार्ग हा अनेक वळणे घेतच पुढे जात असतो. ज्यापर्यंत पोहोचायचे असते, ती ‘मंजिल’ अनेकदा एकच नसते. अनेक व बदलत्या ध्येयांच्या क्षितिजाकडे आपण लक्ष केंद्रित करत असेल तरच आपलीही वळणांवरची कसरत तोल न जाऊ देता, चालत राहायला हरकत नसते. माझेच नव्हे, प्रत्येकाचेच आयुष्य असे वळणवाटांनी भरलेले व भारलेले असते. त्यांच्याकडे मागे वळून पाहिल्यास सुखदु:खाची चढाओढ तर जाणवतेच परंतु त्या पल्याड आपली पावले धावत राहिल्याचे मोलही उमजते. एखाद्या वळणावर काही निसटलेले जाणवते तर काही वेळा एखादी झेप पहाड चढून जाणारी ठरली आहे, असे मिश्र संकेत मिळतात.

पुढे वाचा

मजेत

पद्मजा फाटक वारल्या. अनेक व्याधी, ‘रोपण’ केलेले मूत्रपिंड, त्या मूत्रपिंडाला शरीराने स्वीकारावे यासाठीची औषधयोजना, त्या औषधांचे दुष्परिणाम टाळायला (किंवा सौम्य करायला) आणखी औषधयोजना; अशा साऱ्यांशी बावीस-तेवीस वर्षे झगडून सत्तरच्या वयात ६ डिसेंबर २०१४ ला पद्मजांनी ‘देह ठेवला’
‘आजचा सुधारक’चा आणि त्यांचा जुना स्नेह. दि. य. देशपांडे, प्र. ब. कुलकर्णी, मी, साऱ्यांशी तसाच जुना स्नेह.
शिक्षणाने समाजशास्त्रज्ञ असलेल्या पद्मजांना खरे तर कोणताच विषय वज्र्य नव्हता. ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ आणि (माधव नेरूरकरांसोबतचे) ‘बाराला दहा कमी’ ही त्यांच्या ग्रंथसंपदेतली रत्ने.
ताराबाई मोडक पद्मजांच्या आजी.

पुढे वाचा

स्वच्छतेची घडी

दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट.

सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या होत्या. ती त्यांना घाणेरडा फडका म्हणत होती. पाळीसाठी बाजारू पॅड का वापरीत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली, मी जर ते वापरले तर आपल्याला घरात दूध आणता येणार नाही.

पुढे वाचा

महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती

राष्ट्रसेवादल, बाबा आढाव ह्यांची ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ आणि अन्य परिवर्तनवादी चळवळीतील सहभागाची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना बी. प्रेमानंदांबरोबर ‘विज्ञान जथा’ मध्ये काम करताना आपल्या जीवनकार्याची दिशा सापडली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या कामात एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. श्याम मानव ह्यांच्याबरोबर १९८६ मध्ये ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची एक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. दोन, तीन वर्षे एकत्र काम करताना आचार आणि विचारातील तीव्र मतभेद पुढे आल्याने दोघांनी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. श्याम मानव यांनी आपल्या मोजक्या साथीदारांबरोबर ‘शांतिवन’ नेरे येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती पुनर्गठित केली.

पुढे वाचा

विष्णुशास्त्री चिपळूणकर

इ.स.१८७५-७६ दरम्यान निबंधमालेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी आपला दृष्टिकोण मांडला आहे. त्यांनी वापरलेला अंधश्रद्धेसाठीचा पर्यायी शब्द ‘लोकभ्रम’ हा अधिक वादातीत वाटतो. त्यांची ह्याबाबतची भूमिकासुद्धा आक्रमक, ब्राह्मणद्वेषी अथवा धर्मावर आगपाखड करणारी नाही. भूत नाहीच असे ठामपणे म्हणण्याऐवजी ते म्हणतात, ‘सृष्टीतील अद्भुत चमत्कार पहायची ओढ सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्हाला पण आहे. ह्या विषयी आमची कुणी पक्की खात्री करून दिली तर ती आम्ही फार खुशीने घेऊ.’ ‘वाजे पाऊल आपुलें, म्हणे मागे कोण आले’ ह्यांसारखी बुद्धिवादी संत रामदासांची वचने ते सविस्तरपणे उद्धृत करतात. ‘स्वयंपाकघरात चूल बांधण्यापासून मोठ्या मोहिमेवर जाण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत शकुन-अपशकुन, ग्रहानुकूलता ह्याचा विचार होतो’ ह्यावर तुटून पडताना ते पुढे म्हणतात, ‘अशा त-हेचा अनुभव हा केवळ काकतालीय न्यायाचा भाग आहे.’

पुढे वाचा