कृषि व ग्रामीण विकास (भाग-१) 

दक्षिण आशियातील मानवविकास – २०००

प्रस्तावना : 

केंब्रिजमध्ये प्रा. अमर्त्य सेन ह्यांच्याबरोबर अर्थशास्त्र शिकलेले पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब -उल-हक नंतर जागतिक बँकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून गेले. त्यांनी तेथे केवळ वस्तू आणि सेवांच्या मूल्याच्या बेरजेने व्यक्त केली जाणारी ‘स्थूल राष्ट्रीय उत्पाद’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) ही संकल्पना अपूर्ण आहे असे हिरिरीने मांडून आर्थिक उत्पादन व शासकीय धोरणे ह्यांच्याद्वारे विविध देशांमधील मानवविकास किती साधला जातो अशी संकल्पना रुजू करून तिला जगातील सर्व अर्थशास्त्रज्ञांची व राजकारण्यांची मान्यता मिळवून दिली. त्यांच्या मृत्यूनंतर इस्लामाबाद मध्ये ‘महबूब-उल-हक ह्यूमन डेव्हलपमेंट सेंटर’ स्थापन करण्यात आले.

पुढे वाचा

नॅशनॅलिझमबाबत टिपणे (भाग २) 

नॅशनॅलिझम्सचे समान गुणधर्म पाहिल्यावर त्यांची (इंग्लंडपुरती तरी) वर्गवारी करायला हवी. नॅशनॅलिझम्सचा प्रसार प्रचंड आहे आणि वर्गवारी सोपी नाही. त्यात भ्रम आणि द्वेषाचे असंख्य प्रकार आहेत, आणि त्यांचे परस्परसंबंध अत्यंत क्लिष्ट आहेत. जगातील काही टोकाचे दुष्टावे तर युरोपीय जातिवाद्यांपर्यंत पोचलेलेच नाहीत. पण मुख्यतः विचारवंत आणि दुय्यम विचारवंत म्हणून सामान्यांच्या नॅशनॅलिझम्स पाहू. 

सरकारी नॅशनॅलिझम

1) नव-टोरीवाद: (पारंपरिक टोरीवाद दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश बल आणि प्रभाव घटला आहे, हे कबूल करतो) नवे टोरीवाद…हे कबूल करत नाही. नव-टोरी नेहमी रशियाविरोधी असतात, पण कधीमधी अमेरिकाविरोधी सूरही लावतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार 

स्वाती जोशी, नवनिर्मिती, ‘साकार’, 564 ब, शनिवार पेठ, पुणे- 30 

‘प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन एक चिंतन’ (ले. भा. स. फडणीस) या लेखावरील प्रतिक्रिया. 

गणित विषय मुलांना शिकवताना, शिक्षकांबरोबर काम करताना, मुलांना संख्यांबाबतचे मूलभूत संबोध अवगत न झाल्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्राथमिक क्रिया करताना मुलांच्या हातून चुका घडत राहतात, याचा सतत अनुभव येत राहतो. फडणीस सर म्हणतात त्याप्रमाणेच नुसती घोकंपट्टी करून, नुसते पाठांतर करून गणित विषय समजणार नाही, तर त्यासाठी संकल्पनांच्या मुळापर्यंत मुलांना घेऊन जायला हवे. 

नियम पाठ करण्यापेक्षा तो नीट समजून घेतला तर तो मुलांच्या अधिक चटकन् लक्षात राहतो हेही अनुभवास येते. 

पुढे वाचा

संपादकीय 

2,340,000,000,000 

नुकत्याच संपलेल्या निवडणूक नाट्यासोबत एक ‘आर्थिक’ उपकथानक घडले. 13 मे ला निकाल लागले आणि ‘डाव्यांच्या मदतीने कॉंग्रेसचे सरकार बनणार हे उघड झाले. 14 ते 16 मे या काळात काही डाव्या नेत्यांनी सरकारकडून त्यांना असलेल्या अपेक्षांविषयी काही विधाने केली. या विधानांनी म्हणे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘एंजिन’ असलेल्या शेअरबाजारात घबराट माजली. उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचे मनोबल खचले. त्यामुळे आर्थिक स्थितीचा निदेशक जो ‘सेन्सेक्स’, तो 17 मे रोजी गडगडला. एका दिवसात भारतीय कंपन्यांच्या भांडवलात सुमारे एक-षष्ठांशाची घसरण झाली. डाव्यांच्या अपरिपक्क अर्थशास्त्रामुळे किती प्रचंड नुकसान झाले, हे दाखवण्याची जणु वृत्तपत्रांमध्ये स्पर्धांच सुरू झाली. 

पुढे वाचा

‘काश’ राष्ट्रवाद: तिथेही तेच! 

पाकिस्तानातील प्रस्थापितांना वर्षांनुवर्षे एक काल्पनिक इतिहास शिकवला गेला आहे. तरुणांना स्वतःच्या राष्ट्राची महत्ता सांगणारी गुळगुळीत घोषणावाक्ये तपासायला शिकवले जातच नाही. पर्यायी दृष्टिकोन सुचवलेच जात नाहीत. यामुळे कार्ये आणि कारणे यांच्याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. आणि शिवाय याने ‘काश! वृत्ती रुजते. काश! इंग्रजांनी दक्षिण आशियात हिंदूंची बाजू घेतली नसती, तर!’ किंवा ‘काश. अमेरिकेने आपली वचने पाळून आपल्याला काश्मीर मिळवून दिला असता तर!’ असल्या सुलभीकृत विचारांमुळे विश्लेषणच थांबते. 

जोवर पाकिस्तानातील भडकावू घोषणा आणि ‘ब्रेनवॉशिंग’ संस्कृतीची जागा खऱ्याखुऱ्या वैचारिक विविधता येणार नाही, तोवर पाकिस्तान हे आधुनिक, कार्यप्रवण राष्ट्र होणार नाही.

पुढे वाचा

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ४) 

अपूर्णांकाविषयी थोडेसे 

अपूर्णांक :- अपूर्णांकासाठी जे चिन्ह वापरतात त्याचा अर्थ मनात रुजल्याशिवाय अपूर्णांकाचे गणित मुलांना समजत नाही. म्हणजे एकाच्या 4 समान भागापैकी 3 भाग. अपूर्णांकाचे संबोध मुलांना समजावून सांगताना क्षेत्रफळाचा उपयोग करावा लागतो. 

सममूल्य अपूर्णांक :- एका वर्तुळाचे 4 समान भाग करून 3 भाग अधोरेखित केल्याने वर्तुळाचे जे क्षेत्रफळ व्यापल्या जाते तेवढेच क्षेत्रफळ वर्तुळाचे 8 समान भाग केल्यावर त्यापैकी 6 भाग अधोरेखित केल्याने व्यापल्या जाते. 

ह्यावरून एक महत्त्वाचा गुणधर्म मिळतो. अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले असता अपूर्णांकाची किंमत बदल नाही. 

पुढे वाचा

वाचकांचे लेखक व्हावे, यासाठी 

‘आजचा सुधारक’ने नेहेमीच असे मानले आहे की वाचकांचे लेखक होऊ शकतात व हा क्रम पुढे सल्लागार, संपादक वगैरेंपर्यंतही जाऊ शकतो. मी (नंदा खरे) असाच वाचक, पत्रलेखक करत कार्यकारी संपादक झालो आहे. 

पत्रे, चर्चा, लेख यांचे एकूण प्रमाण 63% सुमारे दोन-तृतीयांश आहे. संपादक व सहकारी 25% भाग व्यापतात. संपादक व सहकाऱ्यांचा भाग कमी होऊन वाचक-लेखकांचा भाग वाढावा, ही आमची नेहेमीचीच इच्छा आहे. 

पत्रांपैकी बरीचशी चर्चेत भाग घेऊन खंडनमंडन करणारी असतात. हे आवश्यकच आहे, पण तेवढ्यावर पत्रलेखकांनी थांबू नये. नुसतेच खंडनमंडन बरेचदा अतिशय आग्रही, कधीमधी व्यक्तिगत पातळीला जाते.

पुढे वाचा

राजकारण, प्रसारमाध्यमे आणि पैसा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अधूनमधून असा ‘भास’ होतो की प्रसारमाध्यमे ही केवळ श्रीमंत आणि सबळ लोकांच्या प्रचारकांसारखी वागतात. सर्वसामान्यांना माहिती पुरवण्याऐवजी माध्यमे काहीतरी ‘खपवत’ असतात, असा दृष्टिकोन ठेवल्यास त्यांची वर्तणूक जास्त नेमकेपणाने दिसते. 

[नोम चोम्स्की आणि एड्वर्ड एस. हर्मन ह्यांच्या प्रसारमाध्यमांबाबतच्या ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ या ग्रंथाचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना लवकरच करून दिला जाणार आहे. हा विषय महत्त्वाचा का आहे ते जाणून घेण्यासाठी तहलका प्रकरण आठवावे. 

काही बाबतीत तहलकाला समांतर असे एकोणीसशे सत्तरीतले अमेरिकेतले वॉटरगेट प्रकरण होते. आधी सरकारी कर्मचारी वापरून रिचर्ड निक्सनच्या रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाच्या वॉटरगेट या इमारतीतल्या कार्यालयात छुपे मायक्रोफोन्स बसवायचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

‘पुरोगामी’ मुस्लिम विचारवंतांचा ‘बुद्धिवाद’. 

रफीक झकेरिया, ए. जी. नूराणी आणि असघर अली इंजिनियर हे तिघेही पुरोगामी मुस्लिम विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेखात गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रत्येकी एका पुस्तकाचा परामर्श घ्यायचा आहे. झकेरिया यांचे ‘कम्यूनल रेज इन सेक्युलर इंडिया’ (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, 2002) नूराणी यांचे ‘इस्लाम अँड जिहाद’ (लेफ्ट वर्ड, नवी दिल्ली, 2002) आणि इंजिनियर यांचे रॅशनल अॅप्रोच टु इस्लाम’ (ग्यान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली, 2001) ही ती पुस्तके होत. 

या तीन्ही पुस्तकांत इस्लामचे स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले आहे. सर्व लेखकांची त्या स्वरूपाबद्दल एकवाक्यता आहे.

पुढे वाचा

आदर्श नेतृत्व असे असावे 

सामान्य माणूस हा कोणतीही घटना, व्यक्ती, विचार किंवा प्रश्न यावर वरवर विचार करतो. त्याच्या विचारात सखोलता नसते व त्याचे विचार सर्वकषही नसतात. नेत्याने सामान्य माणसाला त्याचा विचार हा सखोल नाही, हे पटवून द्यायला पाहिजे. आणि त्यासोबतच त्याने कोणतीही व्यक्ती, विचार, घटना किंवा प्रश्न यावर कसा विचार करावा, हे त्याला शिकविले पाहिजे. लोकांच्या खऱ्या गरजा कोणत्या आहेत व लोकांनी आपल्या कल्याणाच्या दृष्टीने कोणती उद्दिष्टे ठेवली पाहिजेत, हेही नेत्याने लोकांना समजावून सांगितले पाहिजे. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा ठरविलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेत्याने लोकांसमोर ठोस कार्यक्रम मांडला पाहिजे.

पुढे वाचा