विवाह आणि नीती (भाग १५)

घटस्फोट
बहुतेक सर्व देशांत आणि बहुतेक सर्व युगांत घटस्फोटाला काही कारणांकरिता संमती होती. घटस्फोटाची संकल्पना एकपतिक-एकपत्नीक (monogamous) कुटुंबाचा पर्याय म्हणून कधीच केली गेली नाही. त्याचा उद्देश जिथे विवाहितावस्था कायम ठेवणे असह्य झाले असे वाटते तिथे क्लेश कमी करणे हाच राहिला आहे. या विषयातील कायदा भिन्न देशांत आणि भिन्न काळी अतिशय भिन्न राहिलेला आहे. आजही एकट्या संयुक्त संस्थानांत तो एका टोकाला दक्षिण कॅरोलिनात घटस्फोट मुळीच शक्य नसणे येथपासून तो दुसऱ्या टोकाला नेव्हाडामध्ये तो अतिसुलभ असणे येथपर्यंत विविध आहे. अनेक ख्रिस्तीतर नागरणांत (civilizations) पतीला घटस्फोट सहज मिळे, तर काहीमध्ये तो पत्नीला सहज मिळे.

पुढे वाचा

विवेकवाद -१६

गीतेतील नीतिशास्त्र

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका आक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच, अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म-किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे?’

पुढे वाचा

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणाऱ्या देवासुरानी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला, किंवा विश्वकम्यनि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक’ यांस
जून १९९१ च्या अंकात श्री. दिवाकर मोहनी यांचा ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न हा विस्तृत लेख आपण प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या संदर्भातील काही विचार.

श्री. दिवाकर मोहनी आणि तत्सम विचारवंत धर्म, धर्मनिरपेक्षता. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी संकल्पना, त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील आविष्कार यांचा विचार तात्त्विक पातळीवरून करतात आणि व्यावहारिक बाजूकडे जाणून दुर्लक्ष करतात. कधी तर वाटू लागते की हे लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत ! श्री. मोहनी आपल्या प्रतिपादनाची सुरुवातच ‘समजा या शब्दाने करतात, आणि मग ज्या गोष्टी गृहीत धरून चालतात त्यातील काहींची चर्चा एखाद्या महात्म्याच्या वा आचार्याच्या बौद्धिक व भावनिक पातळीवरून करू लागतात.

पुढे वाचा

चार्वाक

संपादक, आजचा सुधारक, यांस,
प्रा. बा. य. देशपांडे यांनी लिहिलेले माझ्या ‘चार्वक दर्शन’ या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रा. बा. वा. कोल्हटकर यांचे त्यावरचे टिपण प्रसिद्ध केल्याबद्दल मी आपला आणि त्या दोघांचाही अत्यंत आभारी आहे. प्रा. कोल्हटकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांविषयीची माझी भूमिका येथे मांडत आहे.
“शंका विचारतो, त्यांचे निरसन व्हावे ही विनंती” इत्यादी प्रकारच्या त्यांच्या भाषेतून एक प्रकारचा विनय सूचित होतो. त्यांच्या प्रत्यक्ष लेखनाचे स्वरूप पाहिले, तर मात्र त्यांनी शंका विचारलेल्या नसून आपल्या आक्षेपांचे खंडन करण्याचे आव्हान दिले आहे असे वाटते. शंका विचारत असल्याचा आभास निर्माण करण्याऐवजी त्यांनी थेट आक्षेपच घेतले असते तर ते प्रामाणिकपणाचे झाले असते.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन (भाग २)

गीता साने (मौज प्रकाशन, १९८६) कि. रु. २८/
गीता सान्यांच्या वरील पुस्तकाच्या परिचयलेखाचा पूर्वार्ध मे ११ च्या अंकात दिला आहे. प्रस्तुत लेख त्याच लेखाचा उत्तरार्ध आहे. पहिल्या लेखात प्रश्नाची पार्श्वभूमी आणि ‘ स्त्री आणि कुटुंबसंस्था’ या विषयांवरील लेखिकेचे प्रतिपादन आले आहे. आपल्या समाजाला समता व स्वतंत्रता ही मूल्ये पटत असतील तर आपली कुटुंबसंस्था बदलावी लागेल असा त्यांचा निष्कर्ष व त्याला पोषक त्यांचे युक्तिवाद आपण पाहिले. ह्या लेखात स्त्री आणि भारतीय न्यायव्यवस्था’, ‘स्त्री आणि भारतीय अर्थव्यवस्था’ आणि ‘ वेश्यासंस्थाः व्यवसाय आणि व्यापार’ या समस्यांवरील त्यांच्या अभ्यासाचा परिचय करून घ्यायचा आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १४)

कुटुंब आणि शासनसंस्था
जारी कुटुंबाची मुळे जीवशास्त्रीय असली तरी नागरित (civilised) समाजांमधील कुटुंब ही कायद्याने निर्मित अशी गोष्ट आहे. विवाहावर कायद्याचे नियंत्रण असते. आणि मातापित्यांचे अपत्यांवरील अधिकार अतिशय बारकाव्याने निश्चित केलेले असतात. विवाह झालेला नसेल तर पित्याला कुटुंबात कसलाही हक्क नसतो, आणि अपत्यावर एकट्या मातेचा अधिकार चालतो. परंतु जरी कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे हा असतो, तरी अलीकडच्या काळात कायदा मातापिता आणि अपत्ये यांच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात पडतो आहे, आणि कायदेकर्त्यांची इच्छा आणि उद्देश यांना न जुमानता तो (कायदा) कुटुंबसंस्था मोडणारी एक प्रमुख शक्ती होऊ पाहात आहे.

पुढे वाचा

विवेकवाद -१५

विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख युक्तिवादांचे परीक्षण केलेले वाचकांना आठवत असेल. आज त्याच विषयाचा पण वेगळ्या दृष्टिकोणातून विचार करण्याचा विचार आहे.
भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान कृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडविल्याची कथा आहे. आज एक वेगळ्या प्रकारचे विश्वरूपदर्शन वाचकांना घडविण्याचे ठरविले आहे. विज्ञानाने आतापर्यंत विश्वाचा जो अभ्यास केला त्यातून विश्वाच्या स्वरूपाचे एक चित्र निश्चित झाले आहे. त्याचे संक्षेपाने वर्णन येथे करावयाचे आहे. हेतू हा की विज्ञानाने घडविलेल्या विश्वरूपदर्शनात आपल्याला कुठे ईश्वर सापडतो का, आणि सापडल्यास त्याचे स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगता यावे.

पुढे वाचा

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती
ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षणसंस्थात अतोनात महत्त्व आलेले आहे. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात वा चटकन श्रीमंत करणारे व्यवसाय करू शकतात, हे असते. विज्ञानाच्या अभ्यासाचा हा हेतू संकुचित असल्याने, विज्ञान हा अभ्यासक्रमामधला महत्त्वाचा पण अर्थशून्य विषय होतो. विज्ञानाची बुद्धिनिष्ठा विद्यार्थ्यांना सापडत नाही, व ते ती शोधीतही नाहीत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
श्री. संपादक ‘आजचा सुधारक’ यांस,
प्रा. स. ह. देशपांडे यांचे एप्रिल (?) १९९१ च्या अंकातील पत्र वाचले. कळविण्यास खेद वाटतो की सावरकसांचे एकही पान उघडावयाचे नाही’ हा (स. रा. च्या म्हणण्यानुसारचा)’ पुरोगामी’ दंडक मी पाळलेली नाही. सावरकराचे समग्र लेखन अभ्यासले असल्याचा दावा मी करीत नाही, पण प्रसंगोपात्त त्यांचे लेखन जरुरीपुरते मी वाचले आहे. त्यांची चरित्रेही वाचली आहेत.
हिंदुत्वाची सावरकरांनी केलेली व्याख्या सुप्रसिद्ध आहे. धर्मनिष्ठ मुसलमान वा ईसाई यांची भारत ही पितृभू असली तरी पुण्यभू होऊ शकत नाही : ‘पुण्यभू’चा संदर्भ holy places या अनि आहे ही गोष्ट स्पष्ट आहे.

पुढे वाचा