विषय «कृषी-उद्योग»

शेती, अन्नसाखळी आणि ऊर्जा

मी ज्यावेळी एकटा बसून असतो त्यावेळी सतत माझ्या डोक्यात एकच विचार घोळत असतो : माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे ऊर्जेवरचे परावलंबित्व कमी कसे करता येईल ? खास करून खनिज तेलावरचे (Fossil Fuel). सायकल वापरता येईल, खाजगी गाडी न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा आश्रय घेता येईल, Compact Fluorescent Bulbs वापरता येतील, विजेवर चालणारी उपकरणे कमी करता येतील, सूर्यचूल, सूर्यबंब वापरता येईल. . . . . पण एक माहिती मिळाली आणि माझे धाबेच दणाणले एक अन्न उष्मांक (food calorie) मिळविण्यासाठी अमेरिका १० खनिज उष्मांक वापरते !

पुढे वाचा

अनुभव

माझ्यासारखा सामान्य माणूस काय नवीन अनुभव सांगू शकणार? तरीपण काही लोकांना ज्यांना अजिबातच या विषयीची माहिती अथवा ीीश नाही, त्यांना त्यात ळपींशीशीीं वाटण्याची शक्यता आहे असे वाटून आज काहीतरी लिहावे असे मी ठरवले आहे.

माझे शिक्षण अभियांत्रिकीमधले. मी पास झाल्यावर २-३ वर्षांनी बार्शीला आलो आणि वाटले की आपला पिढीजात व्यवसाय कोणता, तर शेतीचा! मग आपल्याकडे एवढी शेती असताना आपण ती का करू नये? काही लोकांना ती जमते तर आपल्याला का जमू नये? म्हणून मी शेतीमध्ये भाग घ्यायचा असे ठरविले. सुरुवातीला माझ्या वडिलांनी आम्हाला २० गुंठे जमीन आणि त्याला पुरेल एवढे एका विहिरीचे पाणी, मोटार वगैरे गोष्टी वापरायची परवानगी दिली.

पुढे वाचा

रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी रुळलेली वाट सोडून काहीतरी नवलाईचा मार्ग पत्करावा असे वाटत होते. घरच्यांचे पाठबळ होते. शेती करायची ऊर्मी होती, ध्यास होता. १९७६ साली खामगाव तलावाकाठी एक पडीक रान शेलारवाडीच्या ‘हडवळ्यांत’ विकत घेतले.

पुढे वाचा

पेराल ते उगवेल

[कॉलिन टज् आपल्या सो रॉल वुई रीप, (पेंग्विन, २००३) या पुस्तकात अन्न आणि शेतीबद्दलचे दूरदृष्टीचे विश्लेषण करतो. पुस्तकाचे उपशीर्षक आहे, येत्या दहा हजार वर्षांत जन्मणारे सारे जण छान, पोटभर जेवू शकतील; पण प्रत्यक्षात आपली नजीकची पिढीच कशी धोक्यात येऊ शकेल’ पुस्तकाच्या काही भागाचा हा संक्षेप.]

दूरदृष्टीने पाहता . .
माणूस हा एक थोराड आणि खादाड प्राणी आहे, हे आपण विसरलो. ही आपली गेल्या काही हजार वर्षांतली सर्वांत मोठी चूक आहे. पूर्वीचे काही समाज आपल्या परिसराचा नाश करून स्वतःही नष्ट झाले आहेत.

पुढे वाचा

माती व पाणी : निविष्टांचे मूल्यांकन

प्रास्ताविकः
जगाच्या इतिहासात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ज्या ज्या प्रदेशात कृषि-उत्पादकता उत्तम होती, त्या ठिकाणी संपन्नता आली. त्याबरोबरच मानवी संस्कृतीचा विकास झाला. माया संस्कृती, मोहिंजोदारो (सिंधु), ईजिप्त, ग्रीस या भूतकाळात मानवी संस्कृती विकसित झाल्या याचे एक कारण म्हणजे तेथे कृषि-उत्पादन उत्तम होते. कृषि-उत्पादनात दोन महत्त्वाचे नैसर्गिक घटक आहेत माती आणि पाणी. त्यांची उपलब्धी, प्रकार, गुणवत्ता, आकारमान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातीचा ह्रास म्हणजे संस्कृतीचा विनाश हा धडा आपणास गतइतिहास सांगतो व शिकवतो. पण आपण काय धडे गिरविले आहेत ते पाहू.

पुढे वाचा

अवर्षणप्रवण भागासाठी मेंढपाळ (कुरणी) संस्कृतीला भविष्यात महत्त्व

१. लोकशाहीचे मूल्यमापन करताना कमी जास्त काळाचे तीन टप्पे आढळतात. पहिल्या टप्प्यात नेतृत्व तत्त्वांशी एकनिष्ठ आणि वाहून घेतलेले असते. दुसऱ्या टप्प्यात नेतृत्व संधीसाधू होते आणि त्याच प्रकारच्या नोकरशहांना हाती धरून समाजाची लूटमार चालू करते. अडाणी, अशिक्षित जनतेच्या हे काहीच लक्षात येत नाही. ती आपली मिळालेल्या चारदोन अनुदानाच्या (subsidies) तुकड्यांवरच संतुष्ट असते. हळूहळू समाज सुशिक्षित होतो. लोकशाहीची त्याची समज प्रगल्भ होत जाते आणि नेतृत्वाकडून तो देशहिताची मागणी करू लागतो. व्यापक देशहिताचा विचार करणारे सरकार त्याला हवे असते. सध्याचा काळ दुसऱ्या अवस्थेकडून तिसऱ्या अवस्थेकडे सरकतानाचा दिसतोय.

पुढे वाचा

कंत्राटी शेतीपद्धती भारतीय शेतकऱ्यांस वरदान ठरेल का?

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कंत्राटी शेती या ना त्या स्वरूपात प्रचलित आहे. आपणास बऱ्यापैकी माहीत असलेली बटईची शेती (वाट्याने) आणि खंडाने (Lease) शेती ह्या दोन पद्धती प्रमुख आहेत.
पहिल्या करार पद्धतीअंतर्गत अल्पभूधारक किंवा मध्यम भूधारक, स्वतःची जमीन सधन शेतकऱ्यास उत्पादनासाठी उपलब्ध करून देतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे अशा जमीनधाऱ्या शेतकऱ्याकडे आर्थिक कमकुवत परिस्थितीमुळे शेतीची योग्य औजारे, बैलजोडी इ. उपलब्ध नसते. इतर संसाधनेदेखील मर्यादित असतात. सधन शेतकऱ्याकडे ह्या सर्व सुविधा असतात आणि भांडवलदेखील पुरेसे असते. स्वतःच्या जमिनीबरोबर अजून जास्तीची शेतजमीन कसण्याची त्याची क्षमता असते.

पुढे वाचा

अन्न व फळ प्रक्रिया उद्योग : काल, आज व उद्या

अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग अलिकडे संरक्षण उत्पादन व निर्यात उत्पादनाइतकाच प्राधान्याचा उद्योग झाला आहे.

जगामध्ये दुधाच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकाचा तर अन्न, भाजीपाला, फळे व साखर उत्पादनात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी आपल्या शेतीची दर हेक्टरी उत्पादकता जगाच्या तुलनेत एक-चतुर्थांश किंवा एक-षष्ठांश इतकी कमी आहे. निर्यातीमध्ये आपला जगाच्या बाजारपेठेतील वाटा ०.७१ टक्के म्हणजे एक टक्क्याहूनही कमी आहे. शेतीच्या २२० दशलक्ष टन उत्पादनापैकी भाजीपाला, फळे इतर शेतमालाच्या १२० दशलक्ष टन मालापैकी जवळ जवळ ४० दशलक्ष टन माल दरवर्षी खराब होतो किंवा सडून जातो व अशा त-हेने तीस टक्के नाश पावणाऱ्या मालाची किंमत रु.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : सहकारी साखर, सूतगिरण्या व दुग्धव्यवसाय

सहकारी चळवळीच्या प्रगतीत महाराष्ट्र हे सर्व देशात अग्रगण्य राज्य समजले जाते. महाराष्ट्रातील सहकारीचा खास विशेष म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे सहकारी उद्योग. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने सहकारी अर्थव्यवस्थेचे बलस्थान म्हणून मानले जाते. सहकारी साखर कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर सहकारी सूतगिरण्या प्रस्थापित झाल्या. सहकारी साखर कारखाने स्थापन करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता तर सहकारी तत्त्वावर डेअरी स्थापन करण्यात गुजरात आघाडीवर होता. गुजरातेतील आणंद येथील अमुल डेअरीने सहकारी दुग्धव्यवसायाची मुहूर्तमेढ घातली. त्याच धर्तीवर गुजरातेत अन्यत्र, महाराष्ट्रात व देशात सहकारी दुग्धव्यवसायाचा प्रसार झाला.

स्वातंत्र्याच्या काळात सहकारी उद्योगांना सरकारचे पाठबळ मिळाले याचे कारण सरकारचे आर्थिक धोरण.

पुढे वाचा

सुरक्षित शेतीतच भारताची प्रगती

भारताचे पहिले पंतप्रधान कै. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाण्याची धरणे ही आधुनिक मंदिरे आहेत आणि इतर कोणत्याही गोष्टी करण्यास वेळ लागला तरी चालेल पण शेतीविषयी कोणतीही कृती करण्यास वेळ लागता कामा नये असे विधान केले होते. आता आयटीबीटीच्या युगात शेतीला सर्वांत कमी प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून जागतिक व्यापार परिषदेमुळे जग ही एकच व्यापारपेठ आहे, ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. जागतिकीकरणाचे अर्थशास्त्र रिकार्डो यांच्या तुलनात्मक फायदा या तत्त्वावर अवलबून आहे. याचा अर्थ कोकणामध्ये पोषक वातावरणामुळे आंबा अधिक किफायतशीर येत असेल, तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिरायत भागात जर बाजरी/ज्वारी फायदेशीर येत असेल तर त्या भागात तीच पिके करावीत.

पुढे वाचा