विषय «राजकारण»

इहवाद व हिंदू राष्ट्र

१९४७ च्या सत्तान्तरानन्तर आमचे राज्य secular आहे असे म्हणण्यास पं. नेहरूंनी सुरवात केली. वस्तुतः आमच्या संविधानात, हा प्रचार सुरू झाला तेव्हा secular हा शब्द नव्हता. तो पुढे इन्दिरा गांधीनी घातला. आज बहुधा सर्व पक्षांची secular म्हणवून घेण्यात अहमहमिका लागली आहे.

असे असले तरी या शब्दाच्या अर्थाबद्दल मात्र विलक्षण गोंधळ आहे. काँग्रेसजन साधारणतः secular च्या विरुद्ध communal असा शब्द वापरतात, व रामजन्मभूमीच्या विमोचनाच्या चळवळीला communal म्हणतात. उलट रामजन्मभूमीचे विमोचन ही secular चळवळ आहे असा दावा या चळवळीचे नेते मांडतात.

चेम्बर्सच्या कोशात ‘Secular’ या शब्दाचा अर्थ “Pertaining to the present world or things not spiritual’ असा दिला आहे.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता

धर्म हा शब्द घृ धातूपासून बनला असून त्याचा अर्थ, मनूने सांगितल्याप्रमाणे, धारण करतो तो धर्म असा आहे. धर्म प्रजेचे धारण करतो. सत्य, भूतदया, प्रेम, करुणा, शांति, न्याय इत्यादि मूलभूत तत्त्वांचे माणसांनी पालन करण्यासाठी जे नियम केले गेले तो धर्म होय. म्हणून मानवाचा असा हा एकच धर्म आहे. त्यामुळे धर्मामुळे विसंवाद वाढतो, दंगे होतात, इत्यादि मीमांसा धर्म शब्दाच्या वरील व्याख्येतून निष्पन्न होत नाही. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादि खऱ्या अर्थाने धर्मसंप्रदाय आहेत व या अनि हे आज विसंवाद वाढण्यास कारण बनत आहेत हे नाकारता येत नाही.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता / सेक्युलरिझम

व्याज-धर्मनिरपेक्षता आणि खरी धर्मनिरपेक्षता असा भेद करणे म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा होय. सेक्युलरिझम ही संज्ञा ख्रिश्चन परंपरेमधून उगम पावली आहे. ईश्वराला देय असेल ते त्याला दे व राजाला देय असेल ते राजाला दे असा बायबलमध्ये मानवाला उपदेश आहे. त्यामुळे मानवी जीवन हितावह ठरते. भारतीय परंपरेत अशी संज्ञा आढळत नाही. ईश्वरी क्षेत्र आणि मानवी क्षेत्र स्वायत्त आहेत ही भूमिका भारतीय विचारपरंपरेमधे आढळत नाही. आस्तिकता आणि नास्तिकता एकत्र नांदू शकत नाहीत ही भारतीय विचारांची मूलभूत भूमिका आहे. विज्ञानाच्या विकासामुळे पाश्चिमात्य विचारामधील ईश्वरी क्षेत्र व मानवी क्षेत्र अशी द्वन्द्वात्मक स्वायत्तता ही संज्ञा मागील काही शतकात क्षीण होत जाऊन आज अनीश्वरवाद वैचारिक पातळीवर स्थिर होत चालला आहे.

पुढे वाचा

सावरकरांचा हिंदुत्वविचार

आजचा सुधारक च्या एप्रिल १९९१ (वर्ष २ अंक १) ह्या अंकात ‘धर्मनिरपेक्षताः काही प्रश्न ह्या शीर्षकाखाली डॉ. भा. ल. भोळे आणि श्री. वसंत पळशीकर ह्यांनी परिसंवादासाठी तयार केलेली एक प्रश्नावली प्रसिद्ध झाली. प्रश्नावलीतील एका प्रश्नावर आक्षेप घेणारे माझे पत्र जून १९९१ (वर्ष ३, अंक ३) ह्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याला उत्तर देणारे पळशीकर ह्यांचे पत्र जुलै १९९१ (वर्ष २, अंक ४) ह्या अंकात आले आहे.

हा छोटा लेख म्हणजे पळशीकरांच्या उत्तरावरची प्रतिक्रिया आहे. त्याला पत्राचे रूप न देता लेखाचे देत आहे ह्याचे कारण ह्या निमित्ताने मी सुधारकने योजिलेल्या परिसंवादातच भाग घेतल्यासारखे होत आहे.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता, इ.

आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा