विषय «शिक्षण»

फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता

फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.

राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात.

पुढे वाचा

फलज्योतिष“शास्त्र?”

पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच.

पुढे वाचा

रेषा आणि कविता…!

अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून 
दाखवत फिरतो हाताच्या रेषा 
वाळूचे कण रगडण्याचे सोडून 
दिसरात जपतो दगडाचे नाव 
घाम गाळायच्या ऐवजी 
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं 
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!

सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना 
राजा शांतपणे करत होता यज्ञ 
शत्रू महालाजवळ आले असतानाही 
राजा करत राहिला मंत्रांचा जाप 
पराभवाची फिकीर सोडून 
तो देत राहिला जांभई 
शेवटी बंदिस्त झाल्यावर, 
“छाटण्यात यावे माझे हात” 
अशी याचना करत राहिला…!

उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती 
माझी लायकी ठरवून 
ते घट्ट ठेवतात पाय बांधून 
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे 
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात 
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत 
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे 
त्यांचं पोट भरल्यावर 
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!

पुढे वाचा

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे

पुढे वाचा

बालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे

बालकांना आहे भान, समाजाला केव्हा?

“बालमजूर म्हणजे काय आहे हे लोकांना कळतच नाही म्हणून ते आपल्या लहान-लहान मुला-मुलींना आपल्याबरोबर कामाला नेतात. कां नेतात याचे कारण काय आहे हे तरी कुणाला कळतेय का?

यंदा आठव्या वर्गात जाणारी १३ वर्षे वयाची पिपरी (पुनर्वसन) गावाची सुश्री अमिता महाजन त्वेषाने प्रश्न विचारते आणि समाजाला याचे उत्तर देता येणार नाही हे कदाचित माहीत असल्याने स्वतःच उत्तर देते –

“मोठ्या साहेबांच्या ऑफिसमधील सावलीत काम करणाऱ्या शिपायाला दिवसाचे ६०० रुपये रोज मिळतात; त्यात त्याचे घर आरामात चालते आणि त्याच्या मुलांना कधीच मजुरी करावी लागत नाही; … आणि जे मजूर दिवसभर उन्हांत मेहनत करतात, त्यांना फक्त १५० किंवा १०० रुपये रोज मिळतात.

पुढे वाचा

ऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव

सामाजिक समावेशकतेच्या व समतेच्या संदर्भात सार्वजनिक शिक्षणसंस्था बजावत असलेल्या महत्त्वाच्या आणि आदर्श भूमिकेकडे आपण खूप काळापासून दुर्लक्ष केले आहे. भारतासारख्या देशात त्यांची ही भूमिका निर्विवादपणे त्यांच्या शैक्षणिक भूमिकेपेक्षाही महत्त्वाची ठरते.

सध्याच्या ऑनलाइन  शिक्षणाचे खूळ मला उत्तर भारतातील नागरी वसाहतींमध्ये भिंतीवर  आढळणाऱ्या लैंगिक समस्यावरील रामबाण इलाजाच्या गुप्तरोग क्लिनिकच्या जाहिरातींची आठवण करून देते. या जाहिरातीत ‘जालीम उपाय’ या नावाखाली सर्व प्रकारच्या आजारांवर १००%  इलाजाची हमी दिले जाते. आज भारतीय शैक्षणिक वर्तुळात शाळा-महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत सर्व स्तरांवर प्रत्येक कामात ऑनलाइन शिक्षण म्हणजे एक जादूची कांडी….शर्तिया

पुढे वाचा

मुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा

सॅनिटायझर लावू कुठे-कुठे?

सन्माननीय अधिकारी यांनी अजूनही विचार करावा. शाळा सुरू करण्याचा अट्टाहास करताना होणार्‍या इतर दुष्परिणामांचा शांतपणे विचार करा व माझ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या संकटातून मुक्तपणे जगू द्या.

मुले पेन, पेन्सिल तोंडात घालतात. अंगठा चोखतात. एवढेच काय, कपडेसुद्धा तोंडात घालतात. म्हणून म्हणतो सॅनिटायझर लावू कुठे-कुठे? किती वेळा?

शंभर मुलांत एकच मुतारी. चार पाण्याचे ग्लास. त्याची ओढाओढी.

एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारी पोरे, आनंदाने एकमेकांना टाळ्या देणारी मुले, एकमेकांच्या कानात बोलणारी, मिळून-मिसळून राहणारी पोरे… पेन्सिल, पेन, वही, पुस्तके, पट्टी, पाण्याचा ग्लास, पाणी बॉटल्स, कंपासपेटी, एक ना अनेक गोष्टींची देवाणघेवाण सातत्याने करत असतात.

पुढे वाचा

तंत्रज्ञानाची कास – प्राजक्ता अतुल

‘कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत’, ‘कोरोना टेस्टिंग किट्सची संख्या गरजेपेक्षा कमी’, ‘ढसाळ सरकारी नियोजन’, ‘राज्यसरकारने उचलली कडक पावले’पासून तर कोरोनाष्टक, कोरोनॉलॉजी, कोविडोस्कोप, कोरोनाचा कहरपर्यंत विविध मथळ्यांखाली अनेक बातम्या आपल्या रोजच्या वाचनात येत आहेत. कोरोनाविषयीच्या वैज्ञानिक माहितीपासून ते महामृत्युंजय पठनापर्यंतच्या अवैज्ञानिक सल्ल्यापर्यंतचे संदेश समाजमाध्यमांतून आपल्यापुढे अक्षरशः आदळले जात आहेत. जादुगाराच्या पोतडीतून निघणार्‍या विस्मयकारी गुपितांसारखी कधी सरकारधार्जिणी, कधी सरकारविरोधी, कधी धोरणांचे कौतुक तर कधी कमतरतांची यादी, कधी वैज्ञानिक पडताळणी तर कधी तांत्रिक-मांत्रिक ह्यांच्या उपाययोजना अशी सगळी जंत्री आपल्यापुढे उलगडली जात आहे. यातून विवेकी विचार नेमकेपणाने उचलणे म्हणजे नीरक्षीर परीक्षाच आहे.

पुढे वाचा

भारतीय पुरुष आणि लैंगिक सुखाचे व्यसन

भारतात ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंततरी अश्लील व्हिडियो पाहता येणे सामान्य माणसांसाठी सहजसाध्य नव्हते. त्यामुळेच असेल कदाचित, पण ह्या काळात मराठी रंगभूमीवर कामुक, अश्लील नाटकांची लाटच आली होती. असल्या नाटकांमधे प्रत्यक्ष रंगमंचावर उन्मादक, हॉट, अश्लील दृश्ये दाखवली जातात असं ऐकायला मिळत होतं.
‘हिट अँड हॉट’ नाटके असं वर्णन वृत्तपत्रांमधून होत असे.

वय वर्षे पंधरा-सतरा ह्या वयोगटातील मित्रांचा आमचा गट होता. असल्या नाटकात कायकाय दाखवत असतील ह्याबद्दल चर्चा जवळपास रोजच रंगत होत्या. आमच्या गटातील एका मित्राला अशी नाटके बघण्याबद्दल अगदी टोकाची आवड, असोशी वाटत होती.

पुढे वाचा

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले.

मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती उत्तम आहे. त्यामुळे भारतीय माणूस नीतिमान, स्वाभिमानी, लाच-लुचपतीस बळी न पडणारा झाला आहे. कोणीही भीक मागत नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीला भारतात स्थिरावण्यासाठी भारतातील मूळ शिक्षणव्यवस्था मोडून काढून, कारकून बनवणारी, गुलाम वृत्ती जोपासणारी नवी शिक्षणव्यवस्था बनवावी लागेल.

पुढे वाचा