विषय «इतर»

आपण मेंदूचे गुलाम नव्हे, तर मालक!

[निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न आणि मेंदू-विज्ञान]
मेंदू-विज्ञानामुळे जे अवघड प्रश्न पुढे आणलेले आहेत त्यांतला सर्वांत कठीण प्रश्न आहे तो फ्री विलसंबंधीचा. फ्री विल म्हणजे स्वेच्छा किंवा मुक्त इच्छा. आपण आपला स्वतःचा म्हणून, स्वायत्तपणे काही निर्णय घेऊ शकतो की मेंदूतल्या पेशींच्या जुळण्या आणि मेंदूतली रसायने मिळून आपण काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, ते सगळे ठरवत असतात?
याची सुरुवात झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मेंदूसंबंधी सुरू असलेल्या संशोधनामुळे फ्री विल या संकल्पनेला हादरे बसू लागले. 1983 साली बेंजामिन लिबेट (Benjamin Libet) याने काही प्रयोग केले होते.

पुढे वाचा

अभिजात भारतीय दर्शनांतील शरीर-मन समस्येचे स्वरूप

उपोद्धात
शरीर-मन-समस्या ही तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत समस्यांपैकी, प्राचीन काळापासून चर्चेत असलेली आणि आजही मेंदू-विज्ञानाच्या प्रगतीमुळेच निराळेच वळण घेतलेली अशी समस्या आहे. आणि ती बहुपेडी आहे. म्हणजे, त्या समस्येचे उत्तर शोधता-शोधता तिच्या अवतीभवतीच्या अनेक समस्या-उपसमस्या एकदम सामोऱ्या येतात व त्यांची उकल केल्याशिवाय शरीर-मन-समस्येची सोडवणूक करणेही अशक्य होते. अर्थात तत्त्वज्ञानातील प्रत्येक समस्येसंदर्भात हीच परिस्थिती आढळते, व तरीसुद्धा त्या समस्येचे ढोबळमानाने वर्णन करता येते. त्यानुसार शरीर-मन समस्येच्या अनुषंगाने उद्भवणारे काही प्रश्न पुढीलप्रमाणे –
0 चैतन्याचे वास्तव्य कुठे असते, देहात, मनात की आणखी कोठे? चैतन्य हे स्वतंत्र तत्त्व आहे की परतंत्र?

पुढे वाचा

मन, मेंदू आणि सर्ल

‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू न देता त्यांनी मनाविषयी ज्या सर्वसाधारण समजुती आहेत, त्यांचीही दखल घेतल्याने सर्ल यांचा दृष्टिकोण मोलाचा ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वारसा सर्लना मिळाला, तो आई-वडिलांकडून. वडील इंजीनिअर तर आई डॉक्टर.

पुढे वाचा

शोध जाणिवेचा : मानसप्रत्ययशास्त्र आणि मेंदू

मानसप्रत्ययशास्त्राची उभारणी त्याचा प्रणेता जर्मन तत्त्वज्ञ एडमंड हुसर्ल (1859 ते 1938) यांच्या तात्त्विक भूमिकेमधून आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झालेली आहे.
ज्ञानाच्या शक्यतेबद्दलच शंका बाळगणारा संशयवाद, ज्ञान स्थलकालानुरूप बदलते असे मानणारा सापेक्षतावाद यांना हुसर्लचा तीव्र विरोध होता. ज्ञान वस्तुनिष्ठ (objective), निश्चित (certain) आणि शंका घेणे शक्यच होणार नाही (indubitible) असेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक विज्ञानच काय, पण गणित आणि भूमिती या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानशाखाही ज्ञानाच्या या कसोटीला उतरत नाहीत कारण या प्रत्येक ज्ञानशाखेची आपापली गृहीते असतात, आणि त्या गृहीतांना त्या-त्या ज्ञानशाखेत आह्वान दिले जात नाही.

पुढे वाचा

कारागृहातील महिलांची स्थिती

दि.3 एप्रिलच्या हिंदू ह्या दैनिकामध्ये दिव्या त्रिवेदी ह्यांनी कारागृहांमध्ये होणारी महिला कैद्यांची छळणूक ह्या विषयावर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे – सर्व कारागृहे सोनी सोरींनी भरली आहेत.
ह्या लेखात महिला कैद्यांना दिलेल्या बेकायदेशीर, अमानुष वागणुकीचे किस्से कचन केले आहेत. त्यातील काही आसु च्या वाचकांसाठी देत आहे.
1. तिहार कारागृहाच्या वार्ड क्र.8 च्या वॉर्डनशी थोडी वादावादी झाल्यामुळे जोहरा बरताली हिला ओटीपोटात जबरदस्त गुद्दे मारण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून तिला एक महिनाभर रक्तस्राव होत होता. शेवटी त्यातच तिचा अंत झाला.

पुढे वाचा

ही स्त्री कोण? (भाग २)

Women पासून Womanist आणि womanish रूपे आली. Womanish हा शब्द मुख्यतः अमेरिकन काळ्या माताकडून वयात आलेल्या पौगंडवयीन मुलींसाठी वापरला जाणारा बोलीभाषेतील शब्द आहे. पौगंडवयीन मुलींना पूर्ण स्त्रीत्वाकडे नेणारा या अर्थाने पण girlish च्या विरुद्ध अर्थी वापरला गेला.
हा अर्थ घेऊनच feminism ही संज्ञा आणि संकल्पना रुळली, नवा वैचारिक प्रवाह अस्तित्वात आला आणि स्थिरावला. पण feminism ही गोऱ्या स्त्रियांसाठीचा पक्षपात करणारी शब्दरचना असल्याने womanism ही संज्ञा आली. Womanism हा ‘त्या रंगाची स्त्री’ (women of color) आणि तिचे विदारक अनुभवविश्व यांचे वर्णन करण्यासाठी ही संज्ञा ॲलिस वॉकर41 या लेखिकेने तिच्या In Search of Our Mothers’ Gardens : Womanist Prose (1983) या लेखसंग्रहात प्रथम शब्दबद्ध केली, Womanist चेच प्रगत रूप womanish होय.

पुढे वाचा

पत्रसंवाद

बाबूराव चंदावार, साईनगर, दी. 1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे 411030. दूरध्वनी – 020-24250693
आमचे चिरंजीव उत्पल चंदावारकडे आजचा सुधारक येतो. अधूनमधून मी पाहत असतो. मार्च2012 चा अंकही पाहिला आहे. यात नक्षलवादी, लोकशाहीच देशाची अखंडता’ हा श्री देवेन्द्र गावंडे यांच्या पुस्तकातला अंश मुखपृष्ठावर दिलेला आहे विरोधातलीच भूमिका आजचा सुधारकची आहे, असेच मला वाटले. श्री देवेन्द्र गावंडे यांची भूमिका विरोधातलीच आहे, हे मला या आधीपासूनच माहीत आहे. अर्थात नक्सलवादाची राजकीय विचारसरणी क्रांतीची आहे, ती सुधारणावादाची नाही. म्हणून, आपली नक्सलविरोधाची भूमिका याला साजेशीच आहे, असे म्हणायला हरकत नसावी.

पुढे वाचा

मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी

आपल्या देशातील मध्यमवर्गाने गेल्या शतकात सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीय शोधांपासून तर स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्रांत नेतृत्व पुरवले. वैचारिक क्रांतीच्या उंबरठ्यावर समाजाला ह्या मध्यमवर्गानेच नेऊन ठेवले. मात्र पुढे अचानक काय झाले… मध्यमवर्गीय सुखवस्तू झाले, केवळ व्यावहारिक यशाच्या मागे लागले आणि ते मिळताच आपली जबाबदारी पार पाडेनासे झाले. सामाजिक नीतिमत्तेच्या कालातीत मूल्यांना ते विसरले की काय? उच्चशिक्षणाचे भाग्य लाभलेल्या ह्या वर्गाने मिळकतीचे सोपे पण लबाडीवर आधारलेले मार्ग शोधून काढले, आणि त्यातच त्यांच्या अस्मितेची आहुती पडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण होण्याची गरज प्रतिपादन केली होती.

पुढे वाचा

पाणी मागतात… च्यायला

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता शेतीकरता
ठोकून काढलं पाहिजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं – अहो जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अनं ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
कान इकडं करा. तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले-इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही.

पुढे वाचा

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (२)

औद्योगिक क्रान्तीमुळे पडलेला फरक —
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. तिची बीजे मात्र त्यापूर्वी अंदाजे 500 वर्षे आधी पडली. गतानुगतिक विचारांतून इंग्लंडचे लोक बाहेर पडू लागले. ह्याचा पहिला पुरावा मॅग्ना कार्टा च्या स्वरूपात दिसतो. इंग्लंडच्या सरदारांनी मिळून राजाचे अधिकार सीमित केले, ह्याचा तो दस्तावेज आहे. आणखी काही वर्षांनी इंग्लंडने पोपचे वर्चस्व झुगारून दिले. ह्या दोन्ही घटना आपल्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात. चाकोरीबाहेरचा विचार करण्याचे आणि तो अंमलात आणण्याचे सामर्थ्य एका समाजाने समूहशः दाखविले. बहुतेक सारा यूरोपच सरंजामशाहीतून मुक्त होण्याची धडपड करू लागला.

पुढे वाचा