जाहिरातबाजीचे संकट

जपानमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग होता, इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ. तुमच्या उत्पादनांमध्ये दोष दाखवायला जागा नव्हती. मग तुमच्या देशावर एक खोटेपणाची लाट येऊन आदळली, व्यापार म्हणजे व्यापारच आणि इमानदारी म्हणजे फक्त एक चांगले धोरण, असे मानणाऱ्या प्रदेशातून ही लाट आली. शहरी क्षेत्रे काबीज करून आता इमानदारीने मेहेनत करणाऱ्या क्षेत्रावर हल्ला करणाऱ्या खोट्या आणि अतिशयोक्त जाहिरातींकडे स्वागत करणाऱ्या गिरिशिखरांवरही आता हल्ला होतो आहे. आपल्या कुरूप आणि रानवट सजावटींमधून घेणारा हा वाणिज्यवाद सर्व मानवजातीवर महा-अरिष्ट आणतो आहे, कारण कौशल्यावर तो ताकदीचे ‘आदर्श’ कलम करतो आहे.

पुढे वाचा

संकोच स्थलकालाचा: आणखी कशाकशाचा?

दूरचित्रवाणी व संगणक–महाजाल प्रणालीने माध्यम व शिक्षण यात काय प्रगती/क्रांती केली त्याची वर्णने नव्याने करण्याची गरज नाही. ती गृहीत धरून, या माध्यमांच्या दुसऱ्या बाजूविषयी व एकंदरच संज्ञापन, ज्ञान, शिक्षण यांबद्दल आपण चिकित्सक व्हावे, त्यासाठी काही मुद्दे:
शिक्षणाच्या दोन अंगांचा माध्यमांच्या दृष्टीने अधिक विचार होणे जरुरीचे आहे : मुलीचे, युवतीचे किंवा विद्यार्थिनीचे आकलन कसे घडत जाते; आपल्या स्वतःचे व बाह्य जगाचे तिचे आकलन (पर्सेप्शन) बनवायची प्रक्रिया ही शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तिच्यात कोणती मूल्ये ठसवली जातात, अंगभूत होतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि जगाच्या कोपऱ्यातील एक शेतकरी

हॅना अंजेरीला जागतिक व्यापारातील खाचाखोचा माहीत नाहीत, पण ती ज्याला ‘फ्री मार्केटिंग’ म्हणते अशा खुल्या बाजारपेठेची ताकद ती ओळखून आहे. माझ्या घराशेजारच्या पेट्रोल पंपाजवळ ही पंचेचाळीस वर्षांची नैरोबिअन महिला भाज्या विकते. रोज सकाळी आपल्या बारक्याशा मळ्यातून ती थोडे टमॅटो, कांदे, शेंगा वगैरे गोळा करते आणि दिवसभर पेट्रोल घेणाऱ्यांना ते विकते. नफा जेमतेमच असतो, पण त्या थोड्याशा डॉलरांचा उपयोग ती आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी करते. तिला स्वतःचे भाजीचे दुकान उघडायचे आहे, पण भांडवलाची अडचण आहे. मटार सोलत बसलेल्या मैत्रिणीकडे पाहत हॅना म्हणते, “स्पर्धा फार आहे.

पुढे वाचा

पावसानंतरचे ऊन

माणसाच्या मुलावर जन्मतःच धर्म लादला जातो, ही व्यथित करणारी घटना आहे. प्राण्यांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांना धर्म नसतो; निसर्गदत्त असा फक्त ‘स्वधर्म’ असतो. जगणे—-मैथुन आणि मृत्यू या जीवनचक्राबाहेर त्यांचे जीवन युगानुयुगे गेलेले नाही. प्राण्यांना नाही अशी एक महान गोष्ट माणसाला प्राप्त झाली आहे. ती म्हणजे विकसित आणि विकसित होणारा मेंदू. या मेंदूच्या जोरावर माणसाने मोठे भौतिक कर्तृत्व दाखविले आहे. तसेच अफाट कल्पनाशक्तीचेही वि व निर्माण केले आहे. विविध कलांचे नि साहित्याचे, मानवी जीवनातील दालन हे याचेच प्रगल्भ द्योतक आहे. ‘देवा’ची संकल्पना ही अशीच एक मानवाच्या उत्तुंग कल्पनाशक्तीतून साकार झालेली साहित्यिक संकल्पना आहे.

पुढे वाचा

भारतीय संस्कृती व स्टेम सेल्स

भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य ठरेल.

भारतीय संस्कृती :– माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक (Human Behaviour) असे म्हणतात. मानवी वर्तणूक ही दोनच गोष्टींवर अवलंबून असते.

पुढे वाचा

हिंदूंचे हित कशात आहे?

आपल्या देशात गेल्या तीन दशकांत अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध हत्याकांड सातत्याने होत आहे. ७० च्या दशकात भिवंडीला, ८० च्या दशकात दिल्लीला, ९० च्या दशकात मुंबईला आणि २००० च्या दशकात गुजराथमध्ये. प्रत्येक नियोजित हत्याकांडात पूर्वीच्या दशकातल्या हत्याकांडापेक्षा जास्त अमानुषता आणि संघटित क्रौर्य झाले. गुजरातमधल्या हत्याकांडात हिडीसपणा, बीभत्सपणा यांचा उच्चांक झाला. त्यातल्या अमानुषतेच्या कहाण्या नाझी अत्याचारांनाही लाजवणाऱ्या आहेत. मुख्यतः हे अत्याचार स्त्रियांवर झाले. २७ फेब्रुवारीला गोध्रा येथे रेल्वेच्या एका डब्याला आग लावून ७८ हिंदू प्रवाशांना जिवंत जाळून मारण्यात आले होते. तीही घटना दुर्दैवी आणि अमानुष होती.

पुढे वाचा

संघाचा फतवा: राज्यघटनेलाच आव्हान (एक प्रतिक्रिया)

वरील शीर्षकाचा श्री. सत्यरंजन साठे यांचा लेख साधना साप्ताहिकाच्या २७ एप्रिल २००२ च्या अंकातून घेऊन आजचा सुधारक च्या जून २००२ च्या अंकात छापला आहे. लेखातील विचार पाहता तो तथाकथित बुद्धिवादी आणि सेक्युलरवादी लोकांना संघ आणि संघपरिवारासंबंधी जी कायम कावीळ झाली आहे त्याच दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हजारो वर्षांची जुनी परंपरा आणि प्राचीनता असलेल्या हिंदू जीवनशैलीत सतत सत्य, अहिंसा, सहिष्णुता, विचार, उच्चार आणि आचार-स्वातंत्र्यांचा उद्घोष केलेला आहे. श्री. ज्ञाने वरांच्या पसायदानात ‘जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात’ या आधी ‘दुरितांचे तिमिर जावो, वि व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे म्हटले आहे.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ४

संघर्ष

संसाधन-वापराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणाऱ्या दोन समाजांची गाठ पडली की खूप तणाव उत्पन्न होतो. समाजरचना वेगवेगळ्या असतात. विचारधारा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. इतिहासात वारंवार अशा तणावांमधून तीव्र संघर्ष उपजताना दिसतात. कधीकधी तर वंशविच्छेदापर्यंत मजल जाते. अमेरिकन (रेड) इंडियन्सची संकलकपद्धती जेव्हा यूरोपीय वसाहतवाद्यांच्या शेतकरी-समाजापुढे आली तेव्हा हे घडले. महाभारतातली खांडववन जाळण्याची घटनाही मुळात संकलकांच्या आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचेच उदाहरण आहे.
युरोपात औद्योगिक जीवनशैली शेतकऱ्यांशी भिडतानाही हेच घडले. तिथे मोठे वाद उद्भवले ते नव्याने सबळ झालेल्या शासनव्यवस्थेने खेड्यांची सामायिक जमीन बळकावण्यामुळे. आधीच्या शेतकरी जीवनशैलीत चराईची कुरणे, गावसीमेतील वने आणि पाणसाठे गावाच्या सामायिक मालकीचे असत.

पुढे वाचा

विवेकवाद (Reason, Rational आणि Reasonable)

गेली कित्येक वर्षे मी स्वतःला rationalist म्हणवत आलो आहे. पण ‘rationalist’ या शब्दाच्या अर्थाची फोड मी अजून पुरेशी करू शकलो नाही असे मला वाटते. ती करण्याचा आणखी एक प्रयत्न मी करणार आहे.

त्या शब्दाची व्युत्पत्ति पाहता तो शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला आहे असे लक्षात येते. ‘Ratio’ म्हणजे reason; पण ‘reason’ म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. कारण ‘reason’ चे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत, आणि त्या सर्वांच्या अर्थाचा शब्द मराठीत (किंवा संस्कृतात) नेमका सापडत नाही. ‘Reason’ च्या अर्थाचा चटकन् सुचणारा शब्द म्हणजे बुद्धि.

पुढे वाचा

दुष्टचक्र

दुष्टचक्र बदलाची स्पष्टता नाही म्हणून उभारी नाही, उभारी नाही म्हणून शिस्त नाही, आणि शिस्त नाही म्हणून बदलाची शक्यता आणखी लांब गेली, असं दुष्टचक्र आहे, आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, वस्तीतल्या सुविधा मिळवण्याच्या बाबतीत आहे. राजकीय शिस्तीशिवाय उभारी फक्त नेत्यांनाच (स्थानिकही); बाकी जनता ‘गरीब बिचारी कुणी हाका’ अशीच.
दुसरं एक वाटतं. इतिहासाचं ओझं अजूनही वागवणाऱ्या या समाजाला ‘अमुक काम करायला घाण वाटते. त्यामुळे यातून बाहेर पडायला पाहिजे’ अशी ऊर्मी वाटत नाही. श्रमाचं महत्त्व मलाही पटतं, पण एकाच प्रकारचे श्रम एकाच समाजाला सतत करावे लागताना पाहिलं की हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा