गुणवत्ता – यादीचे कौतुक पुरे !
संपादक, आजचा सुधारक यांस,
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे १० वी, १२ वी, चे निकाल लागले की, शिक्षण आणि परीक्षा या संबंधातील चर्चा वर्तमानपत्रांतून एखादा महिना चालते व नंतर शिक्षणक्षेत्रात आणि शासनाच्या शिक्षण-खात्यात पुन्हा सामसूम होते.
लॉर्ड मेकॉलेने, भारतात शिक्षण-पद्धती सुरू केल्यावर ‘ही शिक्षण-पद्धती केवळ आज्ञाधारक सेवकवर्ग तयार करणारी आहे’ – अशी तीवर टीका झाली. परंतु दुर्दैवाने या पद्धतीत अजूनहि फारशी सुधारणा झालेली नाही.
वास्तविकरीत्या ‘परीक्षा’ याचा अर्थ परि+ईक्षण म्हणजे सर्व बाजूंनी पाहणे. बौद्धिक विकासामध्ये कार्यकारणभाव समजणे, तरतम-भाव समजणे, साम्यविरोध समजणे या सगळ्या प्रक्रिया येतात आणि याची परीक्षा घेतली गेली पाहिजे.
स्फुटलेख : महिला-आरक्षण–वरदान की शाप?
हा अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत महिला आरक्षण विधेयक बहुधा संमत झालेले असेल. त्याच्या मूळ स्वरूपात जरी नाही तरी काही तडजोडी करून ते संमत होईल अशी चिन्हे आज दिसत आहेत. ह्या आरक्षणामुळे काही मोजक्या स्त्रियांच्या हातात थोडी अधिक
सत्ता येईल हे कितीहि खरे असले तरी हे हक्क मागून स्त्रियांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपल्या देशाच्या प्रगतीला खीळ घातली आहे. आपला देश कमीत कमी शंभर वर्षे मागे गेला आहे.
मुळात आरक्षण हीच एक भयानक गोष्ट आहे. एकदा आरक्षण मान्य केले की पुष्कळदा अयोग्य व्यक्तींना निवडून द्यावे लागते.
प्रा. लिओनार्ड आणि आजचा जर्मनी
“आपणाला आजच्या जर्मनीत काय काय कमतरता जाणवतात”? कृपया सोबतची प्रश्नावली भरून पाठवाल काय? ‘जर्मनीतल्या एका प्रख्यात नियतकालिकाने अशी प्रश्नावली काही सुप्रसिद्ध विचारवंतांना पाठविली’. प्रश्नावली अशी –
तुम्हाला जर्मनीविषयी बांधिलकी का वाटते? काही खास वैयक्तिक स्नेहरज्जू? जर्मनीच्या इतिहासातील कोणत्या कालखंडात तुम्हाला राहावयाला आवडले असते ? जर्मनीच्या इतिहासातील कोणते पराक्रम, यश ही तुम्हाला सर्वोत्तम वाटतात ? कोणती जर्मन इतिहासकालीन व्यक्ती तुम्हाला आवडते ? वाङ्मय, संगीत, कला, विज्ञान ह्या क्षेत्रांत कोणत्या जर्मन व्यक्ती तुम्हाला महान वाटतात ? जर्मन इतिहासातील सर्वांत पराक्रमी (अर्थात् लष्करी) पुरुष कोण ?
एक प्रकट चिंतन
अलीकडेच मी नथुराम बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने उठलेले वादळ, झालेला गदारोळ व त्यावर बंदी घालून ते शमविण्याचा झालेला प्रयत्न ह्यासंबंधी वृत्तपत्रातून वृत्त, प्रतिक्रिया वाचताना एक विचार सतत मनाला भेडसावत होता. हे सत्यान्वेषण की विकृती?
गांधींवर एकामागून एक तीन नाटके आली. पैकी गांधी विरुद्ध गांधी, गांधी आणि आंबेडकर ह्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. गांधी विरुद्ध गांधी ह्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाल्या. ‘नथुराम’ च्या वेळी सहनशक्तीचा अंत झाला आणि गांधीवादी किंवा गांधीवादी नसले तरी ते राष्ट्रपिता आहेत हे मानणारे ह्यांनी कडाडून विरोध केला अन् तो सफल झाला.
विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्यांतून निर्माण होणारे व्यवस्थेचे प्रश्न
१९९७-९८ ह्या कृषि वर्षात प्रथम अवर्षण व नंतर तीन वेळा अतिवर्षण घडले. त्यातून नापिकी झाल्यामुळे जी देणी देणे अशक्य झाले त्यांचा व त्यांच्याशी संबंधित कौटुंबिक बाबींमुळे शेतक-यांनी आत्महत्या केल्या, नव्हे त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही ही सत्यस्थिती आहे. ही परिस्थिती विदर्भात गेल्या ३० वर्षांत प्रथमच निर्माण झाली हे जरी खरे असले तरी त्या प्रश्नावर तितक्या गांभीर्याने उपाययोजना केली गेली नाही, हेही तितकेच खरे आहे. ह्या घटनेतून सध्याची शेतीची प्रबंधन घडवून आणणारी जी व्यवस्था आहे तिच्यासंबंधी बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे शेतक-यांसह आपण सर्वांनी शोधावयाची आहेत.
‘एकविसाव्या शतकात संतविचाराची सोबत’
‘ललित’ मासिकाचा मे ९८ चा अंक ‘संतसाहित्य आणि एकविसावे शतक’ या विषयावर विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यात एकूण सोळा व्यासंगी विद्वानांचे लेख आहेत. त्यापैकी पाच मराठीचे प्राध्यापक असून, दहा संतसाहित्याचे अभ्यासक, हरिभक्तिपरायण, प्रवचनकार इ. आहेत. उरलेले सोळावे एकमेव वैज्ञानिक श्री. वि. गो. कुळकर्णी आहेत. त्या दृष्टीने लेखकांची ही निवड प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. अशी निवड करण्यात कदाचित् अशी दृष्टी असू शकेल की संतसाहित्यावर लेख मागवायचे तर त्यांचे लेखक त्या विषयाचे अभ्यासक असले पाहिजेत. ते काही का असेना, परिणाम असा झाला आहे की हा विशेषांक संतसाहित्याच्या प्रशंसेकरिताच काढला आहे असा समज होतो; कारण श्री वि.
ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक
गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा चालवणाच्या दि. य. देशपांडे यांनी सुरू केलेल्या आजचा सुधारक ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या नव्या संपादकांनी ‘सिंहावलोकन आणि थोडे आत्मपरीक्षण केले आहे. (आ.सु. जून ९८) त्यात त्यांनी आजचा सुधारकने केलेल्या कामाचे फलित फार अल्प आहे व पुष्कळशा चर्चा एका विशिष्ट परिघात फिरत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
संपूर्ण ग्रंथव्यवसायाला, त्यातही प्रबोधनपर व गांभीर्यपूर्ण लिखाण असलेल्या नियतकालिकांना अवकळा आलेली असताना, गेली आठ वर्षे, न चुकता (व वार्षिक वर्गणीत वाढ न करता) सकस आशययुक्त व विचारशक्तीला चालना देणारे मासिक काढत असल्याबद्दल संपादक-मंडळासहित सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत.
अप्रिय मतांचे नियमन
ज्या मूर्ख मतांमुळे सार्वजनिक जीवनाला अपाय होण्याचा संभव नसेल त्याबद्दल कोणाला तुरुंगात घालणे मला अर्थशून्य वाटते. जर हा नियम टोकापर्यंत ताणला तर फारच थोडे लोक त्याच्या तडाख्यातून वाचतील. शिवाय अश्लीलतेचा बंदोबस्त कायदा आणि तुरुंगवास यांनी करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा संभव आहे. जे केवळ मूर्खपणाचे किंवा दुष्कर्म असेल त्याला मोहक वलय मात्र प्राप्त होते. राजकीय बंद्यांविषयी तर माझ्या भावना अधिक तीव्र आहेत. केवळ राजकीय मतांमुळे एखाद्याला तुरुंगात घालणे कितीही आकर्षक वाटले तरी त्याने त्या मतांचा प्रसार होण्याचाच संभव जास्त असतो. ते मानवी दुःखात भर घालण्यासारखे असून त्याने हिंसेला उत्तेजन मिळते यापलीकडे काही नाही.
संपादकीय
आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
आपल्या आचरणामध्ये श्रद्धामूलक वा संस्कारजन्य परिस्थितिशरणता आहे. विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे. विवेकवाद्यांचे कोणत्याही व्यक्तीशी भांडण नसून श्रद्धेशी आहे, संस्कारांशी आहे त्याचप्रमाणे श्रद्धा, संस्कार आणि आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांत फरक नाही ह्याचा उल्लेख मागच्या अंकात केला होता. समाजातील विषमता काही व्यक्तींवर अतिशय अन्याय करणारी असल्यामुळे आणि विवेकवाद्यांना तिच्याशी लढा द्यावयाचा असल्यामुळे विषमतेची काही बटबटीत उदाहरणे ह्या स्तंभातून देण्याचा मानस आहे. त्यायोगे विषमता का नको ते पुन्हा स्पष्ट होईल आणि तीवर उपाय शोधणे शक्य होईल. अन्यायकत्र्या व्यक्तींना उपदेश केल्याने, त्यांना घेराव, मारहाण किंवा त्यांचे प्राण-हरण केल्याने प्रश्न सुटणार नाहीत तर अविवेकी लोकांच्या मनांत विवेकाचा उदय झाल्यासच ते सुटतील आणि शंभर टक्के लोक विवेकी झाले नाहीत तरी पंचावन्न टक्के होऊ शकतील, विवेकी नेहमीसाठी अल्पसंख्य राहणार नाहीत, असा विवेकवाद्यांचा विश्वास आहे.
पत्रपरिचय
संपादक, आजचा सुधारक
श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांची पत्रे वाचली. स. ह. देशपांडे यांचा लेखही वाचला होता. मला श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.
१) राष्ट्रवाद म्हणजे काय व तो नेहमीच आवश्यक असतो असे आपल्याला वाटते
काय?
२) भारतीय नागरिक राष्ट्रवादी नाही व चिनी आहे हे गृहीतक कशाच्या आधारे मांडायचे?
३) विवेकी राष्ट्रवाद वा प्रगमनशील राष्ट्रवाद कोणता हे कोणी व कसे ठरवायचे?
चीनविषयक तपशिलात जाऊन मूळ मुद्दे बाजूला पडू नयेत अशी विनंती आहे.