लोकसंख्या
‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे.
व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या अल्प असते. मेंढ्या आणि गाई यांची संख्या बरीच मोठी आहे; पण त्याचे कारण मनुष्याचे कर्तृत्व. मनुष्याची संख्या अन्य कोणत्याही मोठ्या प्राण्यांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा फारच जास्त आहे.
विवेकवाद – १८
नैतिक मूल्यांविषयी आणखी थोडेसे
आजचा सुधारक च्या नोव्हेंबर १९९१ च्या अंकात नागपूर येथे भरलेल्या एका वाचक मेळाव्याचा वृत्तांत आला आहे. त्यात झालेल्या चर्चेचे संचालन आमचे मित्र प्रा. अ.ना. लोथे यांनी केले. त्यांनी प्रारंभीच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या अनुषंगाने चर्चा व्हावी असे सुचविले. वेळेच्या अभावी त्यांपैकी काही प्रश्नांना मी संक्षेपाने उत्तरे दिली, परंतु त्यांचा पुरेसा विस्तार मला करता आला नाही, प्रा. लोथे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे, आणि ते अन्यही अनेकांच्या मनात उपस्थित झालेले असणार असे वाटल्यावरून त्यांची काहीशी सविस्तर चर्चा करण्याचे येथे योजले आहे.
आजचा सुधारकः वाचक मेळावा
‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित विचारवंत, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले होते. योगायोगाने प्रसिद्ध विचारवंत श्री. वसंत पळशीकर नागपुरात मुक्कामाला होते. त्यांच्याही उपस्थितीचा आम्ही लाभ घेतला.
गोर्बाचेव्ह
मिखाएल गोर्बाचेव्ह यांची सत्ता सोवियत संघाच्या जनतेने त्यांना पुनः बहाल केली. हजारो लोकांनी रणगाड्यांना तोंड देत, आपले प्राण पणाला लावून नवजात स्वातंत्र्याचे रक्षण केले. बंड करणाऱ्या पुराणपंथी लोकांचा पराभव झाला आणि जी क्रांती गोर्बाचेव्ह यांनी १९८५ साली सुरू केली होती. त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या सामाजिक शाक्तींनी गोर्बाचेव्ह यांना पुनः परत सत्तेवर आणले. १० मे १९८९ पासून रुमानिया, पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया या देशातील जनतेने “जनतेच्या लोकशाह्या” उद्ध्वस्त केल्या. फक्त मे १९८९ मधील चीनच्या जनतेचे बंड अयशस्वी ठरले. कारण चीनच्या ‘जनमुक्तिसैन्याने कट्टरपंथी लोकांना साथ देऊन हजारो तरुण विद्यार्थ्यांचे शिरकाण केले.
१९८९ : एक अन्वयार्थ
मूळ लेखक : पॉल एम्. स्वीझी
एका युगाचा प्रारंभ किंवा शेवट म्हणून, महत्त्वाचे वळण देणारी म्हणून, विशिष्ट वर्षे ही लक्षणीय टप्पे म्हणून इतिहासात नोंदली जातात. १७७६, १७८९, १८४८, १९१७, १९३९ ही अशी काही वर्षे होती. ह्या यादीत जाऊन बसणारे आणखी एक वर्ष म्हणजे १९८९ (एकोणीसशे एकोणनव्वद) हे होय. पण कशासाठी म्हणून ते विशेष लक्षात राहील? Js_ कम्युनिझमचा शेवट झाला यासाठी, असे काही म्हणतील; तर इतर काही, भांडवलशाही आणि समाजवाद यातील संघर्षात भांडवलशाहीचाच अखेर विजय झाला यासाठी, असे म्हणतील. पण मला एक वेगळाच अन्वयार्थ सुचवावासा वाटतो.
धर्म, धर्मकारण, धर्मनिरपेक्षता इत्यादि
गेल्या पाचपन्नास वर्षांत ह्या देशांत अनेक गोष्टींचे वाटोळे करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अर्थात् हे कर्तृत्वही परंपरेतून आले असावे. पिढ्यानपिढ्या आपण हे करीत आलो असलो पाहिजे. नाट्यशास्त्रात एके ठिकाणी जगांत अनेक वर्षे (म्हणजे देश) आहेत, पण एकट्या भारतवर्षांत दुःख आहे; म्हणून तिथे नाटक करायला हवे; असे म्हटले गेले .
त्यावरून आजकाल जे घडते आहे त्यासंबंधी फार आश्चर्य वाटायला नको. पण हा विनोदाचा भाग झाला. तो घटकाभर बाजूला ठेवू. स्थूलमानाने बोलायचे तर इतर फळ्यांप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या फळीवरही आपण अयशस्वी ठरलो आहोत असे म्हणता येईल.
विवेकवाद -१७
गीतेतील नीतिशास्त्र – (उत्तरार्ध)
या लेखाच्या पूर्वार्धात गीतेत जी नीतिमीमांसा आलेली आहे तिचा माझ्या मते यथार्थ अनुवाद मी दिला आहे. आता उत्तरार्धात त्या मीमांसेचे विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करावयाचे आहे.
गीतेतील मोक्षशास्त्र खरे आहे काय?
पूर्वार्धात आपण पाहिले की गीतेतील नीतिमीमांसा मोक्षशास्त्रावर आधारली आहे. त्या मोक्षशास्त्राच्या आधारावाचून गीतेतील नीतिमीमांसेला प्रतिष्ठा नाही. म्हणून तिच्यात अभिप्रेत असलेले मोक्षशास्त्र यथार्थ आहे काय? या प्रश्नाचे उत्तर आपण प्रथम द्यायला हवे.
स्थलाभावी या प्रश्नाचा परामर्श येथे काहीशा संक्षेपानेच घेता येईल. या चर्चेवर दुसरेही एक बंधन आहे. ते असे की हा लेख केवळ तज्ज्ञ, विशेषज्ञ किंवा तत्त्वज्ञ यांनाच फक्त कळेल असा होता कामा नये, साधारण सुशिक्षित अशा सामान्य वाचकालाही तो कळेल असे त्यातील विवेचन असावे असा आमचा प्रयत्न असतो.
एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
मुसलमानांची समता फक्त मुसलमानांपुरतीच होती. इस्लाम धर्म इतका एकतर्फी आहे व स्वतःच्या अटीशिवाय कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण न करता (वन्दे मातरम् म्हणण्याससुद्धा तो तयार होत नाही) मुस्लिमेतरांबरोबर संहअस्तित्वास इतका प्रतिबंध करणारा आहे की तो फक्त मुस्लिम देशांकरिताच योग्य आहे आणि असे असले तरी तेथेही विसाव्या शतकाने कायदेविषयक बदल आवश्यक झाले आहेत. भारतासारख्या मुस्लिम नसलेल्या देशात मुस्लिमेतर बहुसंख्याकांबरोबर मुस्लिम अल्पसंख्याकांना राहावयाचे झाले तर त्यांनी एकरूप व एकात्म होणे जरूरी आहे, हे ओघानेच येते. पण इस्लाम धर्म या गोष्टीस विरोध करतो.
धर्म, धर्मनिरपेक्षता, इ.
आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.
श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत.
सावरकरांचा हिंदुत्वविचार
आजचा सुधारक च्या एप्रिल १९९१ (वर्ष २ अंक १) ह्या अंकात ‘धर्मनिरपेक्षताः काही प्रश्न ह्या शीर्षकाखाली डॉ. भा. ल. भोळे आणि श्री. वसंत पळशीकर ह्यांनी परिसंवादासाठी तयार केलेली एक प्रश्नावली प्रसिद्ध झाली. प्रश्नावलीतील एका प्रश्नावर आक्षेप घेणारे माझे पत्र जून १९९१ (वर्ष ३, अंक ३) ह्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याला उत्तर देणारे पळशीकर ह्यांचे पत्र जुलै १९९१ (वर्ष २, अंक ४) ह्या अंकात आले आहे.
हा छोटा लेख म्हणजे पळशीकरांच्या उत्तरावरची प्रतिक्रिया आहे. त्याला पत्राचे रूप न देता लेखाचे देत आहे ह्याचे कारण ह्या निमित्ताने मी सुधारकने योजिलेल्या परिसंवादातच भाग घेतल्यासारखे होत आहे.